Maharashtra Live Updates : सिंधू नदीच्या पाण्यावर फक्त भारतीय शेतकऱ्यांचा हक्क - PM नरेंद्र मोदी

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Maharashtra Live Updates
Maharashtra Live UpdatesSarkarnama

मोदींच्या भाषणात ज्योतिबा फुलेंचा उल्लेख 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात ज्योतिबा फुले यांचा उल्लेख केला. ते म्हणाले, महात्मा फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त आपण कार्यक्रम सुरू करणार आहोत. मागासवर्गीयांना प्राधान्य देऊन आपल्याला बदल घडवायचा आहे.

देशातील महत्त्वाच्या स्थळांच्या सुरक्षेसाठी  सुदर्शन चक्र मिशन

पंतप्रधान मोदी म्हणाले की, देश ‘सुदर्शन चक्र मिशन’ सुरू करणार आहे. हे सुदर्शन चक्र एक शक्तिशाली शस्त्र प्रणाली असेल, जी शत्रूचा हल्ला केवळ निष्फळ करणार नाही तर अनेक पटींनी जोरदार प्रत्युत्तरही देईल. आपण पुढील दहा वर्षांत सुदर्शन चक्र मिशनला प्रखरतेने पुढे नेऊ. या अंतर्गत २०३५ पर्यंत देशातील सर्व महत्त्वाच्या स्थळांना या राष्ट्रीय सुरक्षा कवचाखाली आणले जाईल. या सुरक्षा कवचाचा विस्तार सातत्याने होत राहील. देशातील प्रत्येक नागरिकाने सुरक्षित वाटावे, यासाठी मी २०३५ पर्यंत या राष्ट्रीय सुरक्षा कवचाचा विस्तार करण्याचा निर्धार केला आहे. म्हणूनच श्रीकृष्णांकडून प्रेरणा घेऊन आम्ही सुदर्शन चक्राचा मार्ग स्वीकारला आहे.

देशाला वेगाने  पुढे जायचे आहे- नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आपण खूप वेगाने पुढे जायचे आहे. मी हे देशासाठी करत आहे, माझ्यासाठी करत नाही. कोणाचे वाईट करण्यासाठी करत नाही. "गेल्या दशकभरात भारताने सुधारणा केल्या, कामगिरी केली आणि परिवर्तन घडवून आणले आहे. पण आता आपल्याला आणखी मोठ्या ताकदीने पुढे जायचे आहे. अलीकडच्या काळात आम्ही अनेक सुधारणा केल्या आहेत त्यामध्ये एफडीआय, विमा क्षेत्रातील सुधारणा, आणि जागतिक दर्जाच्या विद्यापीठांना भारतात कार्य करण्यास परवानगी देणे यांचा समावेश आहे..."

सिंधूच्या पाण्यावर भारतीय शेतकऱ्यांचा अधिकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आपल्या देशातील जनतेला आता स्पष्ट समजले आहे की सिंधु करार किती अन्यायकारक आणि एकतर्फी आहे. भारतातून उगम पावणाऱ्या नद्यांचे पाणी आपल्या शत्रूंची शेती सिंचन करत आले, तर माझ्या स्वतःच्या देशातील शेतकरी आणि जमिनी तहानलेली, पाण्याविना राहिली. हा असा करार होता ज्यामुळे गेल्या सात दशकांपासून माझ्या देशातील शेतकऱ्यांचे अमाप नुकसान झाले आहे. आता या पाण्यावरचा हक्क फक्त भारताच्या शेतकऱ्यांचा आहे..."

लालकिल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला इशाराल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भाषण करताना पाकिस्तानला इशारा दिला की अणुबाॅम्बची ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही. लष्कर त्यांच्या पद्धतीने उत्तर देईल. पाणी आणि रक्त वाहू देणार नाही. सिंधू प्रणालीच्या नद्यांवर फक्त भारताचा अधिकार.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग बाराव्यांदा लाल किल्ल्यावरून ध्वजरोहण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग बाराव्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत आहेत. 2014 पासून पंतप्रधान मोदी यांनी सलग बाराव्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com