Maharashtra Politics Live Updates : मुंबई उपनगर, पुण्यात शाळांना सुट्टी

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Maharashtra Political Live updates
Maharashtra Political Live updatesSarkarnama

Rain news live:  उरळीकांचन, हडपसरसह विविध भागात पाणी साचले

पावसामुळे पुण्यातील अनेक शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, पुण्यातील लोणी, उरळीकांचन, हडपसरसह विविध भागांत झाडे पडली आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईतही उपनगरांतील शाळांना सुट्टी देण्यात आली.

निवडणुकीच्या कामाला लागा, एकनाथ शिंदेंचे आमदारांना आदेश

आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या आमदार, खासदारांची बैठक घेतली. मंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत निवडणुकीच्या तयारीला लागा,असे आदेश शिंदेंनी आमदार खासदारांना केले.

थेऊरमध्ये पावसाच्या पाण्यात 150 जण अडकले

थेऊर येथील रुके वस्ती जिल्हा परिषद शाळा परिसरात पावसाच्या पाण्यात 100-150 नागरिक अडकले. स्थानिक मदतकार्याबरोबरच पीएमआरडीए व NDRF टीमने बचाव करून सुमारे 50-55 नागरिकांना सुरक्षित हलविले. पाणी ओसरत असून सकाळपर्यंत उर्वरित नागरिक घरी परततील. कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पुण्याला ऑरेंज अलर्टचा इशारा, पुढील तीन तास जोरदार पाऊसाची शक्यता

पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला असून पुढील ३ तासांत जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात विजांसह वादळी वारे आणि ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आक्रोश मोर्चा आज काढण्यात येणार आहे. नाशिकमध्ये जोरदार पाऊस सुरू झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी झोपेचं सोंग घेतलेल्या आणि शेतकरी कर्जमाफीसह अनेक खोटी आश्वासनं देऊन जनतेला फसवणाऱ्या स्वार्थी सरकारविरोधात नाशिकमध्ये बळीराजाचा आक्रोश मोर्चा सुरू होतोय.. पाऊस आला तरीही अन्नदात्याच्या हक्काच्या या लढ्यात हजारोंच्या संख्येने सामील व्हा..! असे आवाहन केले आहे.

मुंबई, ठाणे, पालघर बंद पाडू, खासदार सुरेश म्हात्रे यांचा इशारा

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दी बा पाटील यांचे नाव द्यावं यासाठी कार रॅली आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीनंतर मात्र पंधरा दिवसांमध्ये नवी मुंबईचे विमानतळा बद्दल नोटिफिकेशन काढलं नाही तर मुंबई नवी मुंबई ठाणे पालघर बंद पडू असा इशारा भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिला आहे. तसेच दि बा यांच्या नावासाठी दहा लाख आगरी कोळी समाजा रस्त्यावर उतरेल, असे देखील म्हात्रे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com