'एक लाख खरात एकत्र केले, तर एक अकबर होईल', असं वक्तव्य सिने अभिनेता शरद पोंक्षे यांनी केले. नांदेडमध्ये भगवान परशुराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय ब्रह्मण महासंघातर्फे आयोजित परशुराम तेजोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शरद पोंक्षे यांनी मुगले आजम, जोधा अकबर, बाजीराव मस्तानी चित्रपटावर टीका केली. चित्रपटात खरा इतिहास लपण्यात आला आणि अकबर कसा सेक्यूलर होता हे दाखवण्यात आले. एका वेळेला हजारो महिलांचे आयुष्य बर्बाद करणारा अकबर हा सेक्युलर कसा? असा सवाल शरद पोंक्षे यांनी या वेळी केला.