मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आम्ही काँग्रेसकडे आघाडीसाठी कोणताही प्रस्ताव पाठवलेला नाही. त्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. आमच्या पक्षाची भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठरवतात. तेच मांडतात. आमचे प्रवक्ते मांडतात. बाकी कोण मांडत नाही. त्यामुळे काँग्रेससोबतच्या भूमिकेबाबत राज ठाकरे योग्यवेळी निर्णय घेऊन माहिती देतील, असं देशपांडेंनी म्हटलं आहे.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील तीनही टोल नाके तातडीने बंद करावेत, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे. या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना दररोज मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या महामार्गाच्या दुरावस्थेमुळे प्रवासाच्या वेळेत मोठी वाढ झाली असून या लाखो प्रवाशांना दररोज मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचंही तांबे यांनी म्हटलं आहे.
मुंबईतील बहुप्रतिक्षित मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. भाजपने जाणीवपूर्वक या स्टेशनला भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाव दिले नाही, असा गंभीर आरोप काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी केला आहे.
ठाण्यात सोमवारी (ता.13) शिवसेना आणि मनसेच्या वतीने भ्रष्टाचारासह विविध मुद्यांवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले, ठाण्यात गब्बर सिंग कोण? संजय केळकर प्रामाणिक माणूस आहे.ते सत्तेत बसून मोर्चे कसे काढताहेत. मुख्यमंत्र्यांना ठाण्यात लक्ष घालायचं नाही. ठाणेकरांच्या हितासाठी आम्हाला महापालिका वाचवावी लागणार असून हा ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं.
मुंबईतील बहुप्रतिक्षित मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यामुळे दक्षिण मुंबईतील कफ परेड ते पश्चिम उपनगरातील आरे जेवीएलआरपर्यंत पूर्णपणे मेट्रो कार्यरत झाली. मात्र आता मेट्रो लाईन ३ च्या विज्ञान केंद्र या वरळीजवळील स्टेशनच्या नावावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजपने जाणीवपूर्वक या स्टेशनला भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाव दिले नाही, असा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोशल मीडियावर याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
दिल्ली भेटीनंतर नवीन जवाबदारी मिळणार का? असा सवाल प्रसारमाध्यमांशी सुधीर मुनगंटीवार यांना विचारला, यावेळी ते म्हणाले की, आता देवेंद्र फडणवीस येणार आहेत. कुठली जबाबदारी देणार आहेत, तुम्ही देवेंद्रजींना विचारुन घ्या. तुमचं समाधान होईल, माझंही समाधान होईल असं मिश्किल उत्तर सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेली बैठक चांगली आणि ऊर्जा देणारी होती. अमित शाह यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीतील मजकूर सांगता येणार नाही असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आगामी काळात कशा प्रकारे युती करायची याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची उद्या महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीमध्ये देण्यात आली. आपल्याला जातीय सलोखा बिघडवायचा नाही, जातीय सलोखा ठेवा, अशा सूचना या बैठकीमध्ये शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. सरकारमधील काही नेते व मंत्री सध्या वादग्रस्त बोलत आहेत, मात्र आपण बोलताना प्रेमाची भाषा वापरा अशा सूचनाही पवारांनी दिल्या.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50 टक्के तरुणांना संधी देणार असल्याचे शरद पवारांनी जाहीर केले. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजच्या बैठकीत आगामी निवडणुकांसंदर्भात मोठी घोषणा केली. जास्तीत जास्त तरुणांना संधी कशा प्रकारे देता येतील यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना शरद पवारांकडून देण्यात आल्या आहेत.
अजितदादा शिक्षण सोडून बारामतीमध्ये आल्यावर शेती करायला सुरूवात केली, पोल्ट्री व्यवसाय वाढवला, वेगवेगळी पिके घेतली. मग त्यांनी राजकारणाचा मार्ग निवडला. गणितात अतिशय हुशार आणि इमारती, रस्ते, पूल आदींच्या बद्दल इंजिनियरला लाजवेल असा अभ्यास असणारे अजितदादा आहेत. त्यांचा दृष्टिकोन हा काळाच्या पुढे बघण्याचा कायम राहिलेला आहे. शिक्षण आणि कृषी क्षेत्रात एआय वापरण्यासाठी आग्रही असणारे अजितदादा पवार आहेत. त्यांना भविष्याचा अचूक वेध घेता येतो तो त्यांच्या अभ्यासू आणि चौकस दृष्टीकोनामुळेच, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या टीकेला उत्तर दिले.
राज्य सरकारकडून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी हात खुला करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून 48 हफ्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांची 2200 कोटी रुपयांची रक्कम देण्यास मंजुरी देण्यात आली. यंदा दिवाळीनिमित्ताने एसटी कर्मचाऱ्यांना 6 हजार रुपये सानुग्रह अनुदान म्हणजे बोनस देण्यात येणार आहे. त्याचसोबत 12 हजार रुपयांच्या उचलसंदर्भात देखील घोषणा करण्यात आली.
स्थानिक आणि राज्य पातळीवर बोलताना जातीवाचक बोलू नका. समाजातील जातीय सलोखा बिघडणार नाही, याची काळजी घ्या. बोलताना प्रेमाची भाषा वापरा, अशी सूचना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना केली आहे. सरकारमधील काही नेते आणि मंत्री सध्या वादग्रस्त बोलत आहेत, असेही पवार यांनी म्हटले आहे.
ठाण्यात स्वबळावर निवडणूक लढविण्याची भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे. ठाण्याचा महापौर हा भाजपचा झाला पाहिजे, अशी आमची आणि भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे. भाजप कायम ३६५ दिवस लढण्याच्या तयारीत असते, असे आमदार संजय केळकर यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा निघणार आहे. ठाणे महापालिकेच्या कारभाराबाबत जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या माध्यमातून ठाकरे बंधू आपली ताकद दाखवणार आहेत.
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवण्याची तयारी सुरू केली आहे. सर्वच नेत्यांनी मुंबईत स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केल्याचे समजते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती करण्यास राज्यातील नेत्यांचा विरोध असल्याचे समजते, त्यामुळे मनसेबाबत कोणतीही तडजोड स्वीकारण्यास ते तयार नसल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीतील काँग्रेस नेत्यांची मनसेबाबत चर्चा सुरू असली तरी राज्यातील नेत्यांचा मनसेसोबत युती करण्यास विरोध असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यातील निवडणुका पारदर्शक व्हाव्यात आणि लोकांचा संभ्रम दूर व्हावा यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवडणूक आयोगाकडे जावे, यासाठी मनसे प्रयत्नशील होती. यासाठी मनसे, ठाकरे गट, भाजप, शिंदे गट, अजित पवार राष्ट्रवादी आणि शरद पवार राष्ट्रवादी या सर्व प्रमुख पक्षांना लेखी निमंत्रण पाठवण्यात आले आहे. उद्याची बैठक फक्त निवडणुका पारदर्शकतेने व्हावी यासाठी आम्ही एकत्र येतोय, एवढाच प्रश्न आहे. यामध्ये महाविकास आघाडीचा काही संबंध नाही, असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले.
राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी महायुती होणार आहे. त्यामुळे सर्व नेतेमंडळीने कामाला लागावे. ज्या ठिकाणी महायुतीती होणार नाही, त्याठिकाणी मित्रपक्षावर टीका करू नका असा सल्ला नेत्यांना दिला. तर येत्या काळात लवकरच मुंबई विभागातील आढावा लवकरच घेणार असल्याचे सीएम फडणवीस यांनी स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सुद्धा सोबत घेणे गरजेचे आहे, अशी राज ठाकरेंची इच्छा आहे, असे वक्तव्य केले होते. आता यावरुन राजकारणात नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. आता यावर संजय राऊत यांनी युटर्न घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना थेट मेसेज करत स्पष्टीकरण दिले आहे. मी असे काहीही बोललो नाही’ असा खुलासा संजय राऊत यांनी या मेसेजमध्ये केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्हा परिषद गट
खेडगाव - अनुसूचित जमाती महिला
कसबे वणी - अनुसूचित जमाती
कोचरगाव - अनुसूचित जमाती
अहिवंत वाडी - अनुसूचित जमाती
उमराळे बु. - अनुसूचित जमाती
मोहाडी - अनुसूचित जमाती
पंचायत समिती गण
टिटवे - अनुसूचित जमाती महिला
अहिवंत वाडी - अनुसूचित जमाती महिला
कसबे वणी - अनुसूचित जमाती
लखमापूर - अनुसूचित जाती
कोचरगाव - अनुसूचित जमाती महिला
नळवाड पाडा - अनुसूचित जमाती
उमराळे बु. - अनुसूचित जमाती महिला
ननाशी - अनुसूचित जमाती
खेडगाव - ओबीसी महिला
मातेरेवाडी - ओबीसी महिला
मोहाडी - सर्वसाधारण
पालखेड बंधारा - ओबीसी
भुजबळ नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते, ते म्हणाले की,
मी वर्तमानपत्रातून वाचले. महायुतीमधील तिन्ही पक्षांची युती होईलच असे नाही.तिथली परिस्थिती बघून निर्णय घेतील. काही ठिकाणी भाजप बाजूला असेल आणि शिंदे - अजित पवार यांची युती होईल. तर काही ठिकाणी भाजप व अजित पवार युती होईल शिंदे बाजूला असतील असेही होवू शकते. स्थानिक पातळीवर काहीही होऊ शकते
संजय राऊत यांच्या तब्येत अचानक बिघडली आहे. भांडुप मधील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये संजय राऊत यांना उपचारासाठी अॅडमिट करण्यात आलं आहे. काही दिवसापूर्वी संजय राऊत यांनी फोर्टीज हॉस्पिटल मध्ये आपली रक्त तपासणी केली होती. त्यांना घशाचा त्रास होत असल्याची माहिती आहे.
भाजप माझ्यावरच टिकेचा भडिमार करत आहे. गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी कुणी माझ्याशी बोलत नाही. पोलीस म्हणाले की, तुमच्यावर गुन्हे दाखल करायची तयारी झाली आहे. रविंद्र धंगेकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले समीर पाटील चंद्रकात दादांच्या मार्फत माझ्यावर मोक्का लावण्यासाठी पोलिसांसोबत तयारी करतोय.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक काँग्रेसमध्ये मोठे बदल घडत आहेत. या संदर्भात मुंबईत बैठक होत असून या बैठकीत सांगलीच्या युवा आमदारांवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे मोठी जबाबदारी सोपवणार असल्याची माहिती समोर येत आहे
स्थानिक स्वराज्य निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची मुंबईक बैठक सुरु आहे. या बैठकीत आगामी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची मागणी वरिष्ठ नेत्यांकडून होत आहे.
बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालू यादव, माजी मुख्यमंत्री राबड़ी देवी व विधानसभेतील विरोधी नेते तेजस्वी यादव यांना दिल्लीच्या राउज अव्हेन्यू कोर्टाने आईआरसीटीसी घोटाळा व ‘लँड फॉर जॉब’ प्रकरणात आरोप निश्चित करण्याचा निर्णय दिला. त्यांच्या राजकीय आणि कायदेशीर संकटात मोठी वाढ झाली आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव व्हीलचेअरवर कोर्टात हजर झाले. आयआरसीटीसी घोटाळा आणि ‘लँड फॉर जॉब’ प्रकरणातील आरोपपत्रावर आज निर्णय होणार आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये लालू यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत, त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यवतमाळच्या कळंब तालुक्यातील पिंपळखुटी इथं 6 वर्षीय बालकाचा सर्दी खोकल्याची औषध घेतल्यानंतर मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेताना प्रकृती बिघडल्यानंतर पुढील उपचारासाठी यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात रेफर केल्यानंतर मृत्यू झाला. मेडिकलच्या औषधांची तपासणी केली जात आहे. मध्यप्रदेशच्या प्रकरणानंतर खबरदारी म्हणून दोन ब्रँडच्या कफ सिरपचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले असून, तपासणी अहवालाची प्रतीक्षा आहे.
राज्याचे कृषी मंत्री आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता भरणे यांची धाराशिव जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याच्या दृष्टीने पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी भरणे यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकारी, प्रवक्ते आणि नेत्यांची आज बैठक शिवतीर्थावर बोलावली आहे. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाशी युतीवर राज ठाकरे काय भाष्य करतात, यावर आता चर्चा रंगली आहे.
अमरावतीमध्ये भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा बैठक घेणार आहे. यानिमित्ताने जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. भाजपचे शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष शेखर भोयर यांनी लावलेल्या बॅनरवर युवा स्वाभिमानी पक्षाचे नेते तथा आमदार रवी राणा यांचे फोटो झळकले आहेत. भाजपच्या बॅनरवर रवी राणांचा फोटो असल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी वेत्ये गावातील कलेश्वर मंदिरलगत असलेल्या ओढ्यात तब्बल 12 फुट लांब महाकाय मगरीला पकडण्यात आलं. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाच्या रेस्क्यू टीमने या मगरीला पकडलं. वनविभाग या मगरीला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याची पुढील कार्यवाही करणार आहे.
'महायुतीने निवडणूक काळात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची हमी दिली होती. अतिवृष्टीमुळे शेतकरी आता संकटात आहे. आशावेळी कर्जमाफीची गरज आहे. ती घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,' असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.
बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) काल रविवारी जागा वाटप केले. विधानसभेच्या 243 जागांपैकी भारतीय जनता पक्ष व संयुक्त जनता दल प्रत्येकी 101 जागा लढणार आहेत. लोकजनशक्ती पक्षाला 29 जागा देण्यात आल्या आहेत. संयुक्त जनता दल पहिल्यादांच भाजपपेक्षा जास्त लढवणार आहे.
अहमदनगरचे आता अहिल्यानगर नामांतर झाले आहे. मात्र अद्याप अनेक ठिकाणी अहमदनगरच्या पाट्या दुकानांवर दिसत आहे. अशा दुकानांचे परवाने रद्द करण्याची कारवाई महापालिकेने करावी, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्री निवासस्थानी जावून रविवारी सहकुटुंब स्नेहभोजन केले. या दोघांमध्ये यानिमित्ताने राजकीय चर्चा झाल्याचे समजते. गेल्या तीन महिन्यात ठाकरे बंधूंची ही सहावी भेट आहे.
अंबरनाथ-बदलापूर पालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये युती झाली आहे. मात्र, या युतीमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला स्थान देण्यात आलेले नाही. अंबरनाथ-बदलापूर पालिकेत यापूर्वी शिवसेनेची सत्ता होती. त्यामुळे एकनाथ शिंदे येथे स्वबळावर लढण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.