हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात काल मध्यरात्री भूकंपाचे तीन धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिरली हे गाव असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता अनुक्रमे 4.6, 3.6 आणि 3.9 एवढी नोंदवण्यात आली आहे.