Mahesh Landage and Bullock cart race

Mahesh Landage and Bullock cart race

Sarkarnama 

बैलगाडा शर्यत सुरु होण्यासाठी महेश लांडगेंनी जीवाचं रान केलं!

Bullock cart race : नेत्यांनी दिले महेश लांडगेंना श्रेय...

पुणे : महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत (Bullock cart race) सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज काही अटी शर्तींसह मागच्या १० वर्षांपासून असलेली बंदी उठवली आज उठवली आहे. या काळात अनेकांनी हि बंदी उठावी यासाठी प्रयत्न केले पण भोसरीचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी हि बंदी उठावी यासाठी जीवाचे रान केलं अशी प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजच्या निकालानंतर सोशल मिडीयाच्या माध्यमातून या दोन्ही नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमचा अतिशय पारंपारिक खेळ असलेल्या बैलगाडा शर्यतीवर मा. सर्वोच्च न्यायालयाने बंदी मागे घेतली, याबद्दल मी न्यायालयाचे मनापासून आभार मानतो. २०१४ साली न्यायालयाने ही बंदी टाकली. आमचे सरकार राज्यात आल्यावर मी स्वत: यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. त्यानंतर आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वात एक शिष्टमंडळ सुद्धा केंद्र सरकारकडे घेऊन गेलो. त्यावर तत्कालिन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरजी यांनी एक गॅझेट काढले आणि ही शर्यत पुन्हा सुरू झाली. परंतू न्यायालयाने त्यावर पुन्हा बंदी आणली.

<div class="paragraphs"><p>Mahesh Landage and Bullock cart race</p></div>
निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि आमदार लांडगेंनी दिल्लीत दंड थोपटले...

त्यानंतर २०१७ मध्ये आम्ही एक कायदा तयार केला आणि त्या कायद्याच्या माध्यमातून शर्यत सुरू केली. पण त्यावर न्यायालयाने पुन्हा बंदी आणली. त्यानंतर ‘रनिंग अ‍ॅबिलिटी ऑफ बुल’ अर्थात बैल हा धावणारा प्राणी आहे हे सिद्ध करणारा शास्त्रीय अहवाल तयार करावा असे निवेदन प्राप्त झाले. हा‘रनिंग अ‍ॅबिलिटी ऑफ बुल’ असा शास्त्रीय अहवाल दोन महिन्यात तयार केला. आजचा निर्णय हा त्या अहवालाला स्वीकृत केल्यानंतरच आला आहे. मला या निर्णयाचा अतिशय आनंद आहे. असेही फडणवीस म्हणाले.

<div class="paragraphs"><p>Mahesh Landage and Bullock cart race</p></div>
बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठली : फडणवीस म्हणतात, आमच्या सरकारमुळेच हे शक्य!

तर चंद्रकांत पाटील म्हणाले, बैलगाडा शर्यतीसंबंधित सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेमध्ये प्रचंड आनंद आहे, जल्लोष आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानत ते म्हणाले, न्यायालयाने ग्रामीण भागातील जनतेची मानसिक स्थिती समजून घेतली. तमिळनाडू, कर्नाटक या राज्यांनी कायदा केल्यानंतर महाराष्ट्रातही कायदा केला.

मात्र बंदी आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर आंदोलने झाली होती. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे आमदार महेश लांडगे यांनी अक्षरशः जीवाचे रान केले. ते दिवस रात्र बैलगाडा शर्यत याच प्रश्नांच्या मागे होते. तसेच गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचेही चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com