Aimim : केवळ वेदांताच नाही, किया मोटर्स देखील गलिच्छ राजकारणामुळे हिसकावला गेला..

प्रत्येक वेळी इतके हजार कोटींचे सामंजस्य करार केल्याचे सांगून त्यांनी लोकांना मूर्ख बनवले. (Mp Imtiaz Jalil)
Aimim Mp Imtiaz jalil News Aurangabad
Aimim Mp Imtiaz jalil News AurangabadSarkarnama

औरंगाबाद : गलिच्छ राजकारण आणि इच्छाशक्तीचा अभाव यामुळे महाराष्ट्रातील अनेक मोठे प्रकल्प बाहेरच्या राज्यात गेले. केवळ वेदांताच नाही, तर यापुर्वी आमचा किया मोटार्स प्रकल्प देखील बाहेरच्या राज्याने हिसकावून नेला. (Aurangabad) राज्यातील नेते गलिच्छ राजकीय भांडणात व्यस्त असल्याने ते बेरोजगारांची काळजी का करतील? असा टोला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी तत्कालीन आघाडी व आताच्या शिंदे-फडणवीस सरकारला लगावला.

वेदांता फाॅक्सकाॅन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे राज्यात संतापाचे वातावरण आहे. महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे-फडणवीस सरकार ऐकमेकांवर आरोप करत आहेत. (Aimim) दीड लाख कोटींची गुंतवणकू आणि एक लाख रोजगार देणारा हो मोठा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्राचे मोठे औद्योगिक नुकसान झाले आहे. पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेदांता पेक्षा मोठा प्रकल्प देवू असे आश्वासन देत महाराष्ट्राची बोळवण केली.

तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षा महाराष्ट्र गुजरातच्या पुढे नेऊन दाखवतो, असा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राच्या अभ्यास दौऱ्यासाठी अमेरिकेला गेलेले एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील ट्विट करत वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातने हिसकावून नेल्याबद्दल संताप व्यक्त करत आघाडी व शिंदे सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

इम्तियाज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, वेदांता हा केवळ महाराष्ट्राकडून हिसकावलेला एकमेव प्रकल्प नाही, यापुर्वी देखील आमचा किया मोटार्स हा प्रकल्प हिसकावण्यात आला होता. साहजिकच राज्याचे नेते गलिच्छ राजकीय भांडणात व्यस्त असताना ते आमच्या बेरोजगार तरुणांची काळजी का करतील? इच्छाशक्तीचा अभाव राज्याच्या विकासाची गती मंदावत आहे.

Aimim Mp Imtiaz jalil News Aurangabad
Supriya Sule|भाजपला पराभव दिसू लागलाय; सुप्रिया सुळेंनी जखमेवर मीठ चोळलं...

यापूर्वी महाउद्योग मंत्री सुभाष देसाई औरंगाबादचे पालकमंत्री होते. त्यांना एकही उद्योग इथे आणता आला नाही. प्रत्येक वेळी इतके हजार कोटींचे सामंजस्य करार केल्याचे सांगून त्यांनी लोकांना मूर्ख बनवले.

त्यामुळे वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प आणि बल्क ड्रग पार्क सारखे महाराष्ट्रासाठी रोजगार देणारे प्रकल्प गुजरात, हिमाचल आणि आंध्र प्रदेशात स्थलांतरित करण्यात आले. हे सरकार विकासावर भर देणार असल्याचे आम्हाला सांगण्यात आले, त्यांचा अर्थ इतर राज्यांचा विकास असा आहे हे आम्हाला माहीत नव्हते, असा टोला देखील इम्तियाज यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com