Aurangabad : उद्धव ठाकरेंच्या मास्टर सभेआधीच, फडणवीस मास्टर स्ट्रोक लगावणार..

महापालिकेवर मोर्चा काढत जोरदार शक्ती प्रदर्शनाने महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा हा श्रीगणेशाच म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. (Aurangabad Municipal Corporation)
Devendra Fadanvis-Uddhav Thackeray
Devendra Fadanvis-Uddhav ThackeraySarkarnama

औरंगाबाद : शहरातील तापमान ४३ अंशावर गेले असतांनाच राजकीय तापमान देखील चांगलेच वाढले आहे. (Aurangabad) कधी नव्हे तो पाण्याचा प्रश्न एवढ्या मोठ्या प्रमाणात हाती घेतला जात आहे. शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांकडून या प्रश्नावरून राजकारण सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची ८ जून रोजी मराठावाडा सांस्कृतिक मंडळावर जाहीर सभा होणार आहे. ही सभा मास्टर सभा ठरेल, मैदान अपुरे पडले असा दावा, शिवसेनेकडून केला जातोय.

तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या सभेआधीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे २३ मे रोजी पाणी प्रश्नावर थेट महापालिकेवर मोर्चा काढून मास्टर स्टोक लगावण्याच्या तयारीत आहेत. भाजपकडून काढण्यात येणाऱ्या जल आक्रोश मोर्चाची जोरदार तयारी शहरात सुरू आहे. आतापर्यंत निघालेल्या मोर्चापैकी सर्वात मोठा हा मोर्चा असेल असा दावा भाजपकडून केला जातोय.

५० हजार नागरिक व भाजपचे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होतील या पद्धतीचे नियोजन आणि जबाबदारी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर व स्थानिक पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. पाणी प्रश्नावरून शिवसेनेची कोंडी करत आपण नामानिराळे राहण्याची खेळी दखील भाजपकडून खेळली जात आहे.

पाणी प्रश्नावरून आक्रमक झालेल्या भाजपची धार बोथट करण्यासाठी शिवसेनेकडून ५० टक्के पाणी कपातीचे अस्त्र वापरण्यात आले आहे. परंतु ते देखील निष्फळ करण्यासाठी भाजपकडून गल्लोगल्ली, मंदिरात बैठका घेऊन पाणीपट्टी कपातीची घोषणा कशी फसवी आहे, हे पटवून सांगितले जात आहे. पाणीपट्टी कपातीची घोषणा झाली असली तरी अद्याप कागदावर नाही हे सांगण्याचा प्रयत्न देखील वेगाने सुरू आहे.

Devendra Fadanvis-Uddhav Thackeray
Latur : तरुणांनो, सुशिक्षित बेरोजगार होण्यापेक्षा शिक्षित शेतकरी व्हा..

महापालिकेवर मोर्चा काढत जोरदार शक्ती प्रदर्शनाने महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा हा श्रीगणेशाच म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. फडणवीसांच्या उपस्थितीत निघणाऱ्या जल आक्रोश मोर्चात राज्यभरातील भाजपचे नेते सहभागी होण्याची शक्यता आहे. रखरखते ऊन पाहता मोर्चाची वेळ दुपारी चार वाजता ठेवण्यात आली आहे.

मोर्चानंतर महापालिके समोरच फडणवीसांची सभा होणार आहे. या सभेत फडणवीस काय बोलतात याकडे शिवसेनेचे बारकाईने लक्ष असणार आहे. कारण ८ जून रोजीच्या मास्टर सभेतून त्याला उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रत्युत्तर दिले जाऊ शकते. एकंदरित औरंगाबादेतील पाणी प्रश्न चांगला पेटला आहे, पण या सगळ्यातून नागरिकांच्या हाती काय लागणार ? त्यांना नियमित पाणी मिळणार का? हा खरा प्रश्न आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com