
Beed OBC leader Laxman Hake : मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला काढणाऱ्या मोर्चापूर्वी आंदोलनाची धार वाढवण्यास सुरवात केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी भाषेत टीका सुरू केली आहे. जरांगे पाटील यांच्या या आंदोलनावर ओबीसी आरक्षण बचावासाठी संघर्ष करणारे लक्ष्मण हाके यांनी निशाणा साधण्यास सुरवात केली आहे.
मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टला मुंबईत (Mumbai) मोर्चा काढणार आहे. तत्पूर्वी त्यांनी महाराष्ट्रात मराठा कार्यकर्त्यांची बैठकांचे सत्र सुरू केले आहे. या बैठकांमधून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधत आहेत. मराठा नेत्यांना संपवण्याचे कारस्थान भाजपच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस करत आहेत, असा गंभीर आरोप जरांगे पाटील करत आहेत.
भाजपमध्ये (BJP) मराठा नेत्यांवर किती दबाव आहे, याची माहिती देणारे 25 ते 30 आमदार-खासदारांचे फोन आपल्याला आलेत, असा दावा करत आपल्याकडे यांची यादीत आहे, असे गौप्यस्फोट मनोज जरांगे पाटीलांनी मध्यंतरी केला होता. यानंतर मुंबईतील मोर्चा दंगल घडवून आणण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्लॅन असल्याचा आरोप केला. या आरोपानंतर आता माझ्यावर हल्ला करण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा प्लॅन असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला आहे.
मनोज जरांगे पाटलांच्या या आरोपांमागे मराठा मोर्चापूर्वी वातावरण निर्मिताचा प्रयत्न असल्याचे दिसतो. जरांगे पाटलांच्या या आंदोलन निवडणुका आल्या की सुरू होतात, असा घणाघात भाजपचे आमदार परिणय फुके यांनी केला होता. आता त्यांच्यापाठोपाठ ओबीसी आरक्षण बचावासाठी संघर्ष करणारे लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे कोण आहे, यावर विधान केलं आहे.
लक्ष्मण हाके यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शरद पवार यांच्या सांगण्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी हे आंदोलन हाती घेतलं आहे, असा आरोप केला. 29 ऑगस्टला होत असलेल्या आंदोलनात राजकीय कारण आहे. यातून राज्यातील वातावरण बिघडू शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत या आंदोलनातून मोठं षडयंत्र रचलं जात आहे. अशावेळी राज्यातील ओबीसींनी एकत्र यावं, असं आवाहन लक्ष्मण हाकेंनी केलं.
'मुंबईत कामगार वर्ग आपले भविष्य शोधण्यासाठी जातो आणि त्यांना त्रास द्यायचा नाही. आम्ही मुंबईत येणार नाही. परंतु, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तहसीलमध्ये "ओबीसी जोडो अभियान" राबवणार आहोत. पंचायत निवडणुकीत बनावट "कुणबी" प्रमाणपत्रांमुळे ग्रामीण भागातील ओबीसींसाठी आरक्षण नष्ट झालं आहे', असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.