मंत्रीमंडळ विस्तार : तारीख पे तारीखमुळे इच्छुकांनाही विश्वास बसेना..

अब्दुल सत्तार हे सध्या मुंबईतच आहेत, त्यांच्यांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी देखील उद्याच्या मंत्रीमंडळ विस्तारावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. (Mla Abdul Sattar)
Mla Sanjay Shirsat, Sandipan Bhumre, Abdul Sattar News
Mla Sanjay Shirsat, Sandipan Bhumre, Abdul Sattar NewsSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार उद्या होणार, उपमुख्यमंत्री संभाव्य मंत्र्यांची यादी घेऊन दिल्लीला रवाना झाले असले तरी अद्यापपर्यंत जिल्ह्यातील शिंदे गटाच्या इच्छूक आमदारांना कुठलाच निरोप मिळालेला नाही. (Aurangabad) आज होणार, उद्या होणार अशा चर्चा आणि अनेक मुहूर्त हुकल्यामुळे उद्या मंत्रीमडळ विस्तार होईल असे वाटत नसल्याची प्रतिक्रिया आमदार संजय शिरसाट, (Abdul Sattar) अब्दुल सत्तार यांनी सरकारनामाशी बोलतांना दिली.

शिंदेगट विरुद्ध शिवसेना यांच्यातील वादावरील सुनावणी आता ८ आॅगस्ट रोजी होणार आहे. आजच्या सुनावणीत देखील कुठलाच निर्णय न झाल्यामुळे मंत्रीमंडळ विस्तार होईल का? याबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत. (Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डाॅक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे, त्यामुळे ते मुंबईतच आहेत. तर उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेल्यामुळे ते मंत्रीमंडळ विस्ताराची यादीच घेऊन गेल्याची चर्चा आणि तो उद्याच होणार असे बोलले जात आहे.

परंतु मंत्रीमंडळ विस्तारापुर्वी करावी लागणारी तयारी, संभाव्य मंत्र्यांना शपथविधीसाठी फोन या सगळ्या प्रक्रिया पाहता उद्याही मंत्रीमंडळ विस्तार होणे शक्य नसल्याचे सांगितले जाते. शिंदे गटात औंरगाबाद जिल्ह्यातील पाच आमदार आहेत. पैकी संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार हे महाविकास आघाडी सरकारमध्ये अनुक्रमे कॅबिनेट आणि राज्यमंत्री होते. त्यामुळे या दोघांना शिंदे-फडणवीस मंत्रीमंडळात स्थान मिळणारच असा दावा केला जातोय. तर तिसरे औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट हे देखील मंत्रीपदासाठी इच्छूक आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या जवळचे म्हणून त्यांना देखील संधी मिळू शकते अशी चर्चा आहे. उद्या मंत्रीमंडळ विस्तार होणार या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या तीनही आमदारांशी संपर्क साधला. तेव्हा संजय शिरसाट म्हणाले, उद्या मंत्रीमंडळ विस्तार होईल अशी शक्यता वाटत नाही, मला अद्याप या संदर्भात कुठलाही निरोप किंवा फोन नाही. रात्री उशीरापर्यंत काही घडामोडी घडल्या तर सांगता येत नाही. परंतु आता उद्या विस्तार होईल असे वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Mla Sanjay Shirsat, Sandipan Bhumre, Abdul Sattar News
काॅंग्रेसला धक्का : ईश्वर चिठ्ठीवर अध्यक्ष झालेल्या काॅंग्रेसच्या शेळके भाजपमध्ये

अब्दुल सत्तार हे सध्या मुंबईतच आहेत, त्यांच्यांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी देखील उद्याच्या मंत्रीमंडळ विस्तारावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले आहेत, मुख्यमंत्री आजारी असल्यामुळे त्यांना विश्रांतीचा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे. अशावेळी विस्तार कसा होऊ शकतो ? राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे देखील उद्या दिल्लीत जाणार आहेत, त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तार सध्या तरी शक्य दिसत नाही.

राज्यपाल, कोश्यारी, उपमुख्यमंत्री फडणवीस नसतांना विस्तार कसा शक्य आहे. पुन्हा ७ आॅगस्ट रोजी दिल्लीत निती आयोगाची बैठक आहे, त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीला जावे लागणार आहे. त्यामुळे ७-८ आॅगस्टनंतरच कदाचित विस्तारावर निर्णय होऊ शकतो, असेही सत्तार यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com