CM Eknath Shinde Press : मराठवाड्यासाठी ४५ हजार कोटी; सिंचनावर खर्चणार २७ हजार कोटी...

Aurangabad News : जेवढे निर्णय एका वर्षभरात महायुती सरकारने घेतले, तेवढे याआधी कधीच घेतले गेले नाहीत.
CM Eknath Shinde News
CM Eknath Shinde NewsSarkarnama

Marathwada Cabinet News : मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मराठवाड्यात आयोजित मंत्रिमंडळ बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. २०१६ मध्ये करण्यात आलेल्या घोषणांचे काय झाले? असा सवाल विरोधकांकडून केला जात असताना आजच्या बैठकीत मराठवाड्यातील विविध विकास योजनांसाठीचे तब्बल ४५ हजार कोटींचे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. (Cabinet Meeting News) यात प्रामुख्याने मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांसाठी २७ हजार कोटींची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

CM Eknath Shinde News
Marathwada Cabinet Meeting : निवेदन स्वीकारायला मंत्र्यांना बोलवा; 'आदर्श'चे ठेवीदार आक्रमक, बॅरिकेड तोडले...

मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झालेल्या निर्णयांची माहिती दिली. आमचे सरकार फक्त घोषणा करणारे नाही, तर घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करणारे असल्याचे (Eknath Shinde) शिंदे म्हणाले. मराठवाड्यामध्ये विकासासाठी मोठी झेप घेण्याची ताकद आहे. (Marathwada) विरोधक टीका करतात, पण जेवढे निर्णय एका वर्षभरात महायुती सरकारने घेतले, तेवढे याआधी कधीच घेतले गेले नाहीत.

जे निर्णय घेतले ते सर्वसामान्यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून घेतलेले आहेत. शेतकऱ्यांसाठी, जमिनीसाठी पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन ३५ सिंचन प्रकल्पांना आम्ही सुधारित मान्यता दिली. (Maharashtra) यातून ८ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आली. मागच्या अडीच वर्षांत किती निर्णय घेतले गेले? असे विचारत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. आम्ही फक्त घोषणा करत नाही, तर अंमलबजावणीही करतो, असेही शिंदे म्हणाले.

आज घेतलेले निर्णय मराठवाड्याच्या विकासासाठी, लोकांना न्याय देण्यासाठी असून, त्याला केंद्राकडूनही मदत मिळणार आहे. समृद्धी महामार्गाचा फायदा मराठवाड्याला होणार आहे, औद्योगिक विकासाचे फायदेही या भागाला भविष्यात होतील. जलसंपदा विभागाच्या माध्यमातून मराठवाड्यातील विविध सिंचन प्रकल्पांचे निर्णय घेतले आहेत. १४ हजार कोटी रुपयांच्या विविध सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे.

याशिवाय समुद्रात वाहून जाणारे पश्चिम वाहिन्याचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी १३ हजार कोटी रुपयांचा खर्च आपण करणार आहोत. असे एकून सिंचनावर आपण २७ हजार कोटी खर्च करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एकूणच मराठवाड्यासाठी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ४५ हजार कोटींचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात नदीजोड प्रकल्पांच्या १४ हजार कोटींचा समावेश नाही, याचाही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून उल्लेख केला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com