Dharashiv Agriculture Scam : धाराशिवच्या 21.32 कोटींच्या कृषी घोटाळ्यात मोठी कारवाई; 15 कृषी अधिकारी निलंबित, आता फौजदारीची मागणी

15 Agriculture Officers Suspended in ₹21.32 Crore Dharashiv Agri Scam : IPM-INM योजनांतील अनियमिततेत 17 अधिकारी दोषी; भूमिहीन, मृत व दुबार शेतकऱ्यांच्या नावावर निविष्ठा वाटप झाल्याचा चौकशीत ठपका, पुढील कारवाईकडे लक्ष.
Dharashiv Agriculture Scam
Dharashiv Agriculture ScamSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Agriculture Department : धाराशिव जिल्ह्यातील बहुचर्चित कृषी निविष्ठा घोटाळ्याप्रकरणी अखेर मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे.

एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (INM) योजनांच्या अंमलबजावणीत झालेल्या गंभीर अनियमिततेची चौकशी पूर्ण झाल्यानंतर 17 अधिकारी दोषी आढळले असून, त्यापैकी 15 कृषी अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी चौकशी अहवालाच्या आधारे ही कारवाई केली.

चौकशी अहवालानुसार, भूमिहीन, मृत, दुबार तसेच बिगर सभासद शेतकऱ्यांच्या (Farmer) नावावर कृषी निविष्ठांचे वाटप करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या गैरव्यवहारामुळे शासनाच्या तब्बल 21 कोटी 32 लाख रुपयांच्या निधीचा अपहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणात दोन जिल्हा कृषी अधीक्षक (Agricultural Act), आठ तालुका कृषी अधिकारी आणि चार मंडळ कृषी अधिकारी, अशा एकूण 15 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. चौकशीत एकूण 17 अधिकारी दोषी ठरले असून, उर्वरित दोघांबाबतही विभागीय स्तरावर पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.

Dharashiv Agriculture Scam
Ahilyanagar Estimate Committee Visit : 27 पैकी फक्त 7 आमदार, तरीही बैठकीत अनियमिततांवर बोट; अहिल्यानगरमध्ये आज विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी

तक्रारीनंतर उघड झाला घोटाळा

या घोटाळ्याबाबत आमदार कैलास पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करत अधिकृत तक्रार दाखल केली होती. तसेच शेतकरी आंदोलक अमोल जाधव यांनीही या प्रकरणी आंदोलन छेडत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर शासनाने चौकशीचे आदेश दिले होते.

Dharashiv Agriculture Scam
BLO FIR : BLO कर्तव्यावरून दाखल गुन्हा रद्द; अध्यापनाच्या वेळेत शिक्षकांना निवडणूक कामे, उच्च न्यायालयाचे ताशेरे

निलंबनानंतर पुढचा टप्पा कोणता?

प्रशासकीय कारवाईनंतर आता दोषी अधिकाऱ्यांकडून घोटाळ्याची रक्कम वसूल केली जाणार का? आणि त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल होणार का? याकडे शेतकरी आणि संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

आमदार पाटलांची फौजदारीची मागणी

दरम्यान, आमदार कैलास पाटील यांनी केवळ निलंबन ही अपुरी कारवाई असल्याचे सांगत, संबंधित अधिकाऱ्यांकडून शासनाची रक्कम वसूल करण्यात यावी आणि त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी ठाम मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com