Harshvardhan Jadhav News : हर्षवर्धन जाधव पुन्हा बोलले, मराठा आरक्षण म्हणजे बिरबलाची न शिजणारी खिचडी...

Marathwada News : सरकारने आता दोन महिन्यांत मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र आणि आरक्षण दिल्याचा शब्द दिला आहे.
Harshvardhan Jadhav News
Harshvardhan Jadhav NewsSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation News : कुणबी जातीचे प्रमाणपत्र म्हणजे ओबीसी आणि ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही ही आतापर्यंतच्या सगळ्याच सरकारांची भूमिका राहिलेली आहे. (Marathwada News) त्यामुळे ज्यांना २ जानेवारीची वाट पाहायची आहे त्यांनी ती पाहावी; पण ओबीसीतून मराठा आरक्षण म्हणजे बिरबलाची न शिजणारी खिचडी आहे, ती कधीच शिजणार नाही, अशा शब्दांत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर भाष्य केले.

Harshvardhan Jadhav News
Maratha Reservation: आरक्षणाच्या दिशेने प्रशासनाचे पहिले पाऊल!

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र आणि त्या आधारे आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले. तेव्हापासून हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी ही मागणी पूर्ण होणार नाही, त्यापेक्षा आरक्षणाची ५० टक्के मर्यादा वाढवून राठा समाजाला स्वतंत्र आरक्षणाची मागणी करा. (Maratha Reservation) संसदेत घटनादुरुस्ती करायला लावून कायदा करायला लावा, त्याला सर्वोच्च न्यायालयही नाकारू शकणार नाही, अशी स्पष्ट भूमिका जाधव यांनी घेतली.

अगदी अंतरवालीत जाऊनही त्यांनी हा विषय प्रकर्षाने मांडला. यावरून हर्षवर्धन जाधव यांना प्रचंड ट्रोलही करण्यात आले. (Marathwada) परंतु पुन्हा जाधव यांनी तोच मुद्दा उपस्थितीत करत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण कदापि मिळळणार नसल्याचा दावा करत मनोज जरांगे पाटील यांची मागणी चुकीची असल्याचे म्हटले आहे.

मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर सरकारने आता दोन महिन्यांत मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र आणि आरक्षण दिल्याचा शब्द दिला आहे. सरकारच्या भूमिकेवर विश्वास ठेवत जरांगे यांनी तूर्तास आंदोलन स्थगित केले आहे, परंतु सरकार येत्या दोन जानेवारी पुन्हा मराठा समाजाची दिशाभूल करणार, ओबीसीतून मराठा समाजाला कदापि आरक्षण मिळू शकत नाही. त्यासाठी आपल्याला दिल्लीतच जावे लागेल. कै. अण्णासाहेब पाटलांपासून तर आतापर्यंत आपल्याला भोपळाच मिळाला आहे.

त्यामुळे दोन जानेवारीची वाट न पाहता लोकसभेत सरकारशी भांडून मराठा आरक्षणासाठी कायदा करायला लावून ते मिळवून घेऊ शकतील असे खासदार निवडून पाठवा, असे आवाहन हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा एकदा केले आहे. २ जानेवारीनंतर मराठ्यांनी दिल्ली काबीज करायला निघालचं पाहिजे, अन्यथा काही खरं नाही, असे आवाहनही हर्षवर्धन जाधव यांनी केले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com