Hingoli : बांगर यांच्याकडून कृषी अधीक्षकाला कानाखाली आवाज काढण्याची धमकी..

कळमनुरी व औंढा तालुक्यात पीकविमा कंपनीकडून चुकीचे सर्वेक्षण होत असल्याच्या तक्रारी बांगर यांच्याकडे शेतकऱ्यांनी केल्या होत्या. (Mla Santosh Bangar)
Mla Santosh Bangar News, Hingoli
Mla Santosh Bangar News, HingoliSarkarnama

हिंगोली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार संतोष बांगर यांना सबुरीने घेण्याचा सल्ला त्यांनी फारसा मनावर घेतलेला दिसत नाहीये. (Farmers) शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करतांना बनवाबनवी करत असल्याचा आरोप करत बांगर यांनी कृषी अधिक्षकाला कानाखाली आवाज काढीन, अशी धमकी दिल्याचा नवा प्रकार समोर आला आहे.

एवढेच नाही तर तालृका कृषी अधिकाऱ्यास आपल्या कार्यालयात तीन तास थांबवून ठेवत विमा कार्यालयात तोडफोड केल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Hingoli) हिंगोली जिल्ह्यात पीकविमा कंपनी शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करताना बनवाबनवी करत असल्याचा आरोप करत आज आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी पीकविमा कंपनीच्या कार्यालयात राडा घातला.

कळमनुरी व औंढा तालुक्यात पीकविमा कंपनीकडून चुकीचे सर्वेक्षण होत असल्याच्या तक्रारी बांगर यांच्याकडे शेतकऱ्यांनी केल्या होत्या. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर जिल्हा कृषी अधीक्षकांना आमदार बांगर यांनी लेखी पत्र देऊन संबंधित पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधी विरोधात तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, कृषी विभागाने कोणतीच कार्यवाही केली नसल्याने बांगर संतापले.

त्यांनी कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांना शिवसेना कार्यालयात बोलावून पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेण्याच्या सूचना दिल्या. जोपर्यंत पीकविमा कंपनीचे अधिकारी येणार नाहीत तो पर्यंत तुम्ही शिवसेना कार्यालयातून जायचे नाही, असा दम भरला. तीन तास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना बसवून ठेवल्या नंतरही पिकविमा कंपनीचे अधिकारी येत नसल्याने अखेर बांगरांनी आपला मोर्चा विमा कंपनीच्या कार्यालयाकडे वळवला.

Mla Santosh Bangar News, Hingoli
Latur : आता वाढप्या आपला, आमच्यापेक्षा भाजपचा पालकमंत्री झाला याचा आनंद..

कृषी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन हिंगोली शहरातील पिक विमा कंपनीचे कार्यालय असलेल्या एनटीसी परिसरात ते पोहोचले. तिथे बांगर यांना पाहताच पिक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पळ काढला, मात्र शेतकऱ्यांचा संताप पाहून पिक विमा कंपनीचे कार्यालय लक्ष करत बांगर व त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी साहित्याची तोडफोड केली.

यानंतर हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांना भेटण्यासाठी बांगर जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले. पिक विमा कंपनीच्या विरोधात तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. या घटनेनंतर पिक विमा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व जिल्हा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली. संपूर्ण जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतातील शेतकऱ्यांच्या पिक विमाकंपनी बाबत असलेल्या तक्रारी निकाली काढण्यास सुरुवात केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com