Manoj Jarange Patil Uposhan : मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आंदोलन उधळण्याचा डाव; जरांगे पाटलांचा गंभीर आरोप

Maratha Reservation Protest Manoj Jarange Patil Uposhan : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटलांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे.
Maratha Reservation Issue
Maratha Reservation IssueSarkarnama
Published on
Updated on

Maratha Andolan : 'मी आणि माझा मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही. अर्धवट आरक्षण आम्हाला नको. तुम्ही काहीही प्रयत्न केले, इंटरनेट बंद केलं तरी आमचा मराठा समाज आता हुशार झाला आहे. हजारो लोक महाराष्ट्रातून रात्री येऊन बसले होते. त्यांनी इथं खडा पहारा दिला. छोटी कामं करू नका. इंटरनेट बंद करून वातावरण दूषत करू नका. हे आंदोलन तुम्ही मोडू शकत नाही', असं मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलं आहे.

Maratha Reservation Issue
Maratha Andolan : 'एक मराठा, लाख मराठा' घोषणा देत मुंबईत आमदार निवासाबाहेर वाहनांची तोडफोड; दोघे पोलिसांच्या ताब्यात

'मी इथून हटणार नाही. हे आंदोलन खूप मोठं झालं आहे. हे आंदोलन उधळून लावण्याचा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा डाव आहे. आमच्याकडून उद्रेक होणार नाही आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडवणार नाही. आमचं आंदोलन शांततेत सुरू आहे आणि पुढेही शांततेच आंदोलन सुरू राहणार आहे', असं जरांगे पाटील म्हणाले.

'तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण का देत नाही? आरक्षण देण्यासाठी तुम्हाला किती दिवस लागतील? हे सरकारने स्पष्ट करावं. आरक्षण का देत नाही? हे सांगावं. विधिमंडळाचं विशेष अधिवेशन तातडीने बोलवा. त्या अधिवेशनात महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये समावेश करावा. सर्वपक्षीय आमदारांनी आरक्षण घेण्यासाठी सरकारवर दबाव टाकावा, रिकाम्या हाताने परत येऊ नये. आणि आरक्षण मिळाल्याशिवाय आमचं आंदोलन थांबणार नाही', असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

'मराठा समाजाचे तरुण शांत आहेत. सरकारमधील त्यांचेच लोक तोडफोड करत आहेत. बीड केजमध्ये साखळी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांना पोलिस अधीक्षकांनी विनाकारण उचलून नेलं. हिंसा करणारे बाजूला राहिले आणि सत्याची कास धरून आंदोलन करणाऱ्यांना आमरण उपोषण बंद करायला लावलं. त्यांना ताब्यात घेतलं होतं. पण नंतर सोडून देण्यात आलं', असं म्हणत जरांगे पाटील यांनी प्रशासनावर मोठा आरोप केला आहे.

'राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावण्याबाबत तातडीने निर्णय घेतला नाही आणि महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र नाही दिलं तर मी संध्याकाळपासून पाणी पिणंही सोडेन', असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.

Maratha Reservation Issue
Maratha Reservation Meeting : मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ठाकरेंना निमंत्रण नाही !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com