Manoj Jarange Latest News : मोठी बातमी! मनोज जरांगेंचे बेमुदत उपोषण मागे; आंदोलनाबाबत घेतला 'हा' निर्णय

Maratha Reservation Protest In Antarvali Sarati : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीबाबत पुढाकार घेण्याचे आवाहन
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी गेल्या 16 दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे सुरू असलेले मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी बेमुदत उपोषण मागे घेण्याची घोषणा केली आहे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचारही घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. येत्या दोन दिवसांत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे सांगून जरांगेंनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला.

आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर जरांगेंनी पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा साधला. ते म्हणाले, सरकारने काल चक्रव्यूह रचला होता. मात्र, तो आम्ही तोडला. कायदा सुव्यवस्था राखण्याची जाबाबदारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची असताना ती आम्ही पार पाडली. मुंबईकडे निघालो असता, तेथे पाच हजार महिला होत्या. पोलिसांनी रात्री किंवा आज सकाळी लाठीचार्ज झाला असता तर राज्य पुन्हा एकदा बेचिराख झाले असते. पहिला हल्लाही त्यांनीच केला होता. फडणवीसांना रात्री पुन्हा एकदा अंतरवाली सराटी घडवायचे होते, असा आरोपही जरांगेंनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manoj Jarange Patil
Maharashtra Budget Session 2024 : जरांगेंची मागणी सगेसोयऱ्यांबाबत अधिवेशनात काय निर्णय होणार?

जरांगेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) पुन्हा एकदा सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा समाजाची लाट अंगावर घेऊ नये. त्यांनी मराठा समाजासाठी सगेसोयरेंबाबत काढलेल्या अधिसूचनेनुसार अंमलबजावणी करावी. त्यांना ही संधी आहे, असे म्हणत जरांगेंनी फडणवीसांना टोकले. फडणवीस म्हणतात पोलिस माझे आहेत. त्यांना जनता आपली वाटत नाही. तसे असते तर लोकांवरील केसेस मागे घेतल्या असत्या. पोलिस बाजूला सारावेत आणि सागरचा दरवाजा उघडावा यायला तयार आहे, असे आवाहनही जरांगेंनी केले.

फडणवीसांना (Devendra fadnavis) माझा बळी घ्यायचा असल्याचे गंभीर आरोप करत जरांगे रविवारी सागर बंगल्यावर येतो, असे म्हणत मुंबईच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी समाजबांधवांनी त्यांना रोखले होते. त्यावर जरांगे म्हणाले, तुम्ही लपून बसले असते बंगल्यात पण संपूर्ण राज्य जळाले असते. मात्र, तसे होऊ दिले नाही. जरांगेंच्या आव्हानानंतर मुंबईच्या मार्गावर ठिकठिकाणासह सागर बंगला परिसरातही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, विनापरवाना रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी जरांगेंवर (Manoj Jarange) बीड आणि शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

R

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil News : जरांगेंनी मराठा समाजाचा 'करेक्ट कार्यक्रम' केला! बारस्करांचा आरोप...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com