Nana Patole : `भारत जोडो`, राजकीय फायद्यासाठी नाही, तर देश वाचवण्यासाठी..

फडणवीस यांनी पत्रकारांचा ‘एचएमव्ही’पत्रकार असा उल्लेख केला. त्याबद्दल त्यांनी माफी मागावी व पुन्हा अशी चूक होणार नाही, हे देखील जाहीर करावे. (Nana Patole)
Congress Leader Nana Patole News, Aurangabad
Congress Leader Nana Patole News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : कपाळावर टिकली लावली तरच तुझ्यासोबत बोलतो, असे महिला पत्रकाराला म्हणणाऱ्या संभाजी भिडे गुरुजी यांच्या विरोधात महिला आक्रमक झाल्या आहेत. त्यात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर टीका केली आहे. आंबे खाऊन मुले होतात, अशी अंधश्रद्धा पसरविणाऱ्या भिडेंचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंत्रालयात स्वागत कसे करतात? असा प्रश्‍न पटोले यांनी उपस्थित केला. तर राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा राजकीय फायद्यासाठी नाही, तर देश वाचवण्यासाठी असल्याचेही ते म्हणाले.

Congress Leader Nana Patole News, Aurangabad
Aurangabad : सुषमा अंधारे यांनी शिरसाटांचे पुन्हा वाढवले टेन्शन..

कॉंग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सात नोव्हेंबरला महाराष्ट्रात येत असून, यात्रेच्या तयारीनिमित्त शहरात आलेले (Nana Patole) पटोले पत्रकार परिषदेत म्हणाले, की महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे. पण अंधश्रद्धा पसरविण्याचे काम काही लोक करत आहेत. भिडे यांनी पूर्वी देखील असेच वक्तव्य केले होते. त्यांचे स्वागत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कसे करतात?

राहुल गांधी यांच्या यात्रेबद्दल ते म्हणाले, की भारत जोडो यात्रा ही राजकीय फायद्यासाठी नाही तर देश वाचविण्यासाठी आहे. त्यामुळे भाजप विरोधी सर्वच पक्षांना यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे आणि सर्वजण सहभागी होतील. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात राहुल गांधी यांचे जोरदार स्वागत होईल, जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

सरकारविरोधात बोलणाऱ्या प्रत्येकाचा आवाज सध्या दाबला जात आहे. त्यातून आता पत्रकारही सुटलेले नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांचा ‘एचएमव्ही’पत्रकार असा उल्लेख केला. त्याबद्दल त्यांनी माफी मागावी व पुन्हा अशी चूक होणार नाही, हे देखील जाहीर करावे, असेही नाना पटोले म्हणाले.

सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्याच्या नावाखाली सरकारने दिवाळीत आनंदशिधा वाटण्याचा निर्णय घेत तिजोरीतून ५१३ कोटी रुपये काढले. विनानिविदा हे काम देऊन कंत्राटदाराचे भले करण्यात आले. अद्यापपर्यंत जनतेला आनंदशिधा मिळालेला नाही. सरकारची दिवाळी मात्र गोड झाली, अशी टीकाही पटोले यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com