Abdul Sattar On His PA News : सत्तारांनी मान्य केले, तो माझा पीएच ; मी कोणालाही नेमू शकतो..

Marathwada : ४२ जणांच्या पथकाने अकोला येथे कारवाई केली, पण माध्यमांनी दोन व्यक्तीचाच उल्लेख केला.
Abdul Sattar, Deepak Gawli News
Abdul Sattar, Deepak Gawli NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra : अकोला येथे कृषी विभागाच्या पथकाने बोगस बियाणे विक्रेत्यांवर ठाकलेल्या धाडीनंतर राज्यात एकच खळबळ उडाली. (Abdul Sattar On His PA News) पण ती धाडीमुळे नाही, तर या धाडीत सत्तारांचे पदाधिकारी, पीए यांचा सहभाग व पाच लाखांची लाच मागितल्याच्या आरोपांमुळे. हे प्रकरण अंगलट आल्यानंतर सत्तार यांनी कृषी विभागाने धाड टाकलेल्या पथकातील दिपक गवळी नावाची व्यक्ती ही आपला पीए नसल्याचे माध्यमांना जाहीर सांगितले होते.

Abdul Sattar, Deepak Gawli News
Ambadas Danve On Aurangabad News : `सांगा आता औरंगाबाद हे नाव आणि औरंगजेब कुणाला आवडतो`..

दिपक गवळी कृषी अधिकारी असल्यामुळे ते पथकात होते असा बचाव सत्तार (Abdul Sattar) यांनी केला होता. पण हा बचाव देखील सत्तारांना महागात पडला. अखेर आज `एबीपी माझा`शी बोलतांना सत्तार यांनी दिपक गवळी हा माझा पीएच असल्याचे कबुल केले. (Marathwada) कृषी विभागाचा कोणताही अधिकारी मी पीए म्हणून घेवू शकतो, तो माझा अधिकार आहे, त्यासाठी मला कुणाच्या परवानगीची गरज नाही, असेही सत्तार यांनी सांगितले.

अकोला येथील कृषी केंद्रावर कृषी विभागाच्या पथकाने टाकलेल्या धाडीनंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीका होवू लागली आहे. (Maharashtra) पथकात सत्तारांचे पीए, समर्थक पदाधिकारी व अन्य खाजगी व्यक्तींचा समावेश कसा? असा सवाल केला जात आहे. धाडीतील एका व्यक्तीने विक्रेत्याकडे पाच लाखांची लाच मागितल्याचा आरोप देखील करण्यात आला होता.

यासर्व घटनाक्रमावर सत्तार यांनी सविस्तर भूमिका मांडली. दिपक गवळी हा आपला पीए नाही अशी भूमिका देखील सत्तार यांनी आज बदलली. तो माझा पीएच असल्याचे सत्तार यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे रक्त पिणाऱ्या बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांना सोडणार नाही, त्यांना दहा वर्ष जेलमध्ये जावे लागेल, असा कायदा आम्ही करत आहोत, असे देखील सत्तार यांनी पुन्हा सांगितले.

लाच मागितल्याचा आरोप करण्यात आलेल्या व्यक्तीची देखील चौकशी केली जाईल, तो माझ्या जवळचा व्यक्ती असला तरी कुणालाही सोडणार नाही. ४२ जणांच्या पथकाने अकोला येथे कारवाई केली, पण माध्यमांनी दोन व्यक्तीचाच उल्लेख करत शेतकऱ्यांऐवजी बियाणे विक्रेत्या व्यापाऱ्यांची बाजू घेतल्याचा आरोपही सत्तार यांनी केला. राज्यात कुठेही बोगस बियाणांची विक्री होत असले तर त्याची तक्रार सामान्य व्यक्ती, शेतकरी एका टोल फ्री नंबरवर करू शकतो. ती तक्रार सत्य समजून कारवाई केली जाईल, असेही सत्तार यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com