Abdul Sattar : सत्तारांनी दीड महिन्यातच लाडक्या अधिकाऱ्याला कृषी आयुक्त केले...

औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी असताना सत्तार बोले आणि चव्हाण हाले अशीच परिस्थिती होती. (Abdul Sattar)
Minister Abdul Sattar-Sunil Chavan News, Aurangabad
Minister Abdul Sattar-Sunil Chavan News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे आपल्या रोखठोक भूमिकेसाठी ओळखले जातात. कुठल्याही विषयावर अगदी सहजपणे भाष्य करणारे सत्तार वादातही सापडतात. आपल्या मतदारसंघात किंवा कार्यक्षेत्रातील प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कायमच त्यांचा वचक राहिला आहे. काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांची भीडभाड न ठेवता जाहीरपणे त्यांना सुनावणारे सत्तार मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी मात्र काहीही करायला तयार असतात.

Minister Abdul Sattar-Sunil Chavan News, Aurangabad
Ajit Pawar : राजकारण पेटलं ; 'मविआ' तुलना औरंगजेबाशी ; अजितदादा संतापले, म्हणाले..

अशाच एका मर्जीतील पण साईड पोस्टला फेकल्या गेलेल्या अधिकाऱ्याला बदलीनंतर अवघ्या दीड महिन्यातच सत्तारांननी (Abdul Sattar) आपल्याच खात्याच्या कृषी आयुक्तपदी आणल्याने राजकीय वर्तुळात सत्तारांचा दबदबा किती आहे याची चर्चा सुरू झाली. (Marathwada) सुनील चव्हाण यांची नुकतीच शिंदे सरकारने राज्याच्या कृषी आयुक्त या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे.

औरंगाबादला जिल्हाधिकारी असताना महाविकास आघाडी सरकारमध्ये अब्दुल सत्तार हे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री होते त्याही आधीपासूनची चव्हाण आणि सत्तारांची जवळीक आहे. सुनील चव्हाण यांनी काही काळ अब्दुल सत्तार यांचे खाजगी सचिव म्हणून काम केलेले आहे. त्यानंतर त्यांची औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली. ठाणे महापालिकेतून थेट औरंगाबादला जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात देखील सत्तार यांचाच हात होता असे बोलले जाते.

मर्जीतल्या अधिकाऱ्यांना नेमणूक द्यायच्या आणि मग हवी ती कामे करून घ्यायची, असा राजकारण्यांचा कायम प्रयत्न राहिला आहे. त्याला सत्तार देखील अपवाद नाहीत उलट इतर मंत्री, खासदार, लोकप्रतिनिधींपेक्षा सत्तार प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून जरा अधिकच आपली कामे करून घेतात. दीड महिन्यांपूर्वी सुनील चव्हाण यांची मंत्रालयात असंघटित कामगार आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.

साईड पोस्टला बदली झाल्यामुळे चव्हाण तर नाराज होतेच पण कृषिमंत्री झाल्यानंतर आपल्या मर्जीतला माणूस बदलून गेल्यामुळे सत्तारही त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यामुळे अवघ्या दीड महिन्यात आपली राजकीय शक्ती पणाला लावत सत्तार यांनी सुनील चव्हाण यांना थेट आपल्याकडे असलेल्या कृषी मंत्रालयाच्या कृषी विभागाच्या आयुक्तपदीच नेमणूक दिली.

औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी असताना सत्तार बोले आणि चव्हाण हाले अशीच परिस्थिती होती. आता सत्तार ज्या कृषी खात्याचे मंत्री आहेत त्याच कृषी विभागाच्या आयुक्त पदी चव्हाण यांची वर्णी लागल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे काही भले होते का ? की मग यातून सत्तार आपला स्वार्थच साधणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com