
जालना : शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसनीचे अनुदान देण्याच्या मागणीसाठी भाजपच्या वतीने पालकमंत्री राजेश टोपे यांच्या घरावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा टोपे यांच्या निवासस्थानाकडे जात असतांनाच पोलिसांनी अंबड चौफुलीवर अडवला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले.
जालन्यातील राजूर आणि बावणे पांगरी या दोन महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान होऊनही हजारो शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नाही. या भागातील शेतकऱ्यांना तातडीने अतिवृष्टीचे अनुदान द्यावे, शेतकऱ्यांचे तोडलेले वीज कनेक्शन जोडण्यात यावे या आणि इतर मागण्यांसाठी मागणीसाठी जालना जिल्हा भाजपच्या वतीने पालकमंत्री राजेश टोपे यांच्या निवासस्थानी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात दोनशे ट्रॅक्टर घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते. छत्रपती संभाजी उद्यान ते राजेश टोपे यांचे निवासस्थान असा हा मोर्चा काढण्यात आला. मात्र अंबड चौफुली भागात पोलिसांनी तो अडवल्याने भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी थेट रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. मोर्चा अडवल्यानंर भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक देखील झाली.
आमदार आणि जिल्हाध्यक्ष संतोष दानवे, आमदार नारायण कुचे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. दरम्यान या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आणखी उग्र आंदोलन करण्याचा इशारा या दोघांनी दिला.
राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तुटपुंजे अनुदान दिले. तर काहींच्या अनुदानातून वीज बीलाची रक्कम कपात केली जात आहे. हा प्रकार म्हणजे एक घास द्यायचा आणि तीन पट काढून घ्यायचे, असा असल्याची टीका देखील संतोष दानवे यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.