अतिवृष्टीने दगावलेल्या गाईसाठी 40 हजार तर शेळी-मेंढीसाठी 4 हजारांची मदत मिळणार

गारठा असल्याने मृत मेंढ्यांचा आकडा आणखी वाढणार असल्याचे त्यांनी दत्तात्रेय भरणेंनी (Dattatray Bharane) सांगितले
Dattatray Bharane
Dattatray BharaneSarkarnama
Published on
Updated on

सुपे : पावसाची संततधार, अतिवृष्टी व गारठ्यामुळे राज्यातील सुमारे साडेतीन हजार मेंढ्या मृत्यूमुखी पडून मेंढपाळांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. पण भविष्यात असे नुकसान टाळण्यासाठी काही उपाय-योजना करता येईल का यावर विचार-विनिमय चालू असल्याचे सुतोवाच राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) यांनी सुपे (ता.बारामती) येथे केले.

Dattatray Bharane
स्मशानभूमीच्या उद्‌घाटनाला बोलावले की मला धडकीच भरते : फडणवीसांनी सांगितला तो किस्सा!

सुपे व परिसरातील गावांमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक शेळ्या-मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या. भरणे यांनी शुक्रवारी (ता.3 डिसेंबर) रात्री आठच्या दरम्यान पावसाळी वातावरणात कुतवळवाडीतील नुकसानग्रस्त मेंढपाळांच्या वाड्यावर जाऊन पाहणी करून उपस्थित मेंढपाळांना सरकारकडून प्रत्येकी मृत मेंढीस चार हजार रूपये प्रमाणे नुकसान भरपाई दिली जाईल, अशी ग्वाही दिली व याबाबत पंचनामे करण्याच्या सुचना संबंधितांना केल्या. निसर्गाचे संकट आहे. सामोरे गेले पाहिजे. आम्ही सरकार म्हणून तुमच्या मागे आहोत. निसर्गापुढे कोणाचे चालत नाही. तुम्हाला आधार देण्याचे काम सरकार करत आहे, असा धीर त्यांनी मेंढपाळांना दिला. यावर कायम स्वरूपी काय करता येईल यासाठी तज्ञांकडून अभिप्राय मागवून उपाय योजना करण्याच्या विचाराधीन असल्याचेही सुतोवाच त्यांनी केले.

Dattatray Bharane
शिवेंद्रसिंहराजे की नितीन पाटील; शरद पवार ठरविणार सातारा जिल्हा बँकेचा अध्यक्ष.....

तालुक्यातील कानाडवाडीत लांडग्यांच्या हल्ल्यात २४ मेंढ्या दगावल्या असून, त्यांना वन विभागाकडून मदत मिळण्यासाठी संबंधितांना सुचना केल्याचे सांगून भरणे म्हणाले, राज्यातील विशेषतः पुणे, नगर, सातारा, नाशिक जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे मेंढ्या दगावल्या आहेत. पुणे 2000, नगर 700, नाशिक 515, सातारा 200 मेंढ्या दगावल्या आहेत. पैकी पुणे जिल्ह्यात जुन्नर व आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक प्रत्येकी सुमारे साडेसातशे मेंढ्या दगावल्याची नोंद आहे. गारठा असल्याने मृत मेंढ्यांचा आकडा आणखी वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे दगावलेल्या एका गाईसाठी 40 हजार, बैलासाठी 30 हजार तर शेळी-मेंढीसाठी 4 हजार रूपये मदत दिली जाणार आहे.

भविष्यात असे नुकसान टाळण्यासाठी मेंढपाळांना निवारा, कारपेट, विमा सारखी कायम स्वरूपी योजना राबवण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी या वेळी केली. रामभाऊ लकडे, भानुदास चौधरी, अनिल हिरवे, दत्तात्रेय कदम, शंकर महानवर, भीमा कोकरे आदींनी यावेळी नुकसानीची माहिती दिली. या वेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शितलकुमार मुकणे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, नायब तहसिलदार विलास करे, तालुका पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. आर. आर. पाटील, मंडलाधिकारी लक्ष्मीकांत मुळे, अभिमान माने आदींसह परिसरातील कार्यकर्ते, मेंढपाळ, शेतकरी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com