Manoj Jarange News : मोठी बातमी! मनोज जरांगेंनी केली नवीन घोषणा, 10 फेब्रुवारीपासून...

Maratha Reservation : राज्य सरकारला अल्टिमेटमही दिला आहे, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange Hunger strike Announcement : मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे आणि अवघा महाराष्ट्र पिंजून काढणारे मनोज जरांगे-पाटील यांनी आता एक मोठी घोषणा केली आहे. आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

राज्य सरकारने 15 दिवसांत सग्यासोयऱ्याच्या कायद्याबाबत अंमलबजावणी करावी, अन्यथा 10 फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार असल्याचं जरांगे यांनी जाहीर केलं आहे. सरकारला दिलेली 15 दिवसांची मुदत 9 फेब्रुवारीला संपणार असल्याचंही त्यांनी लक्षात आणून दिलं आहे.

मराठा आरक्षणासाठी उभारलेला लढा आणि त्यासाठी चलो मुंबईची हाक देत काढलेल्या भव्य मोर्चाच्या यशस्वितेनंतर, मनोज जरांगेंचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी रायगडावर पोहोचले होते. यावेळी त्यांच्याशी प्रसारमाध्यमांनी संवाद साधला, असता जरांगे यांनी ही मोठी घोषणा केली.(Manoj Jarange Hunger strike Announcement)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manoj Jarange Patil
Manoj Jarange: रायगडावरून जरांगेंची मोठी घोषणा: मराठा आरक्षणानंतर 'या' समाजासाठी आता लढा उभारणार

यावेळी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारमध्ये बेबनाव असल्याचं म्हटलं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारमधून भिन्न वक्तव्य समोर येत असून, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या भूमिकांमध्ये विरोधाभास दिसत असल्याचं जरांगेंनी दर्शवलं. मुख्यमंत्री शिंदे नोटिफिकेशन काढतात आणि उपमुख्यमंत्री फडणवीस केंद्रापर्यंत जाणार असल्याचं बोलतात. ही दोन वेगळी विधानं कशासाठी, मराठा समाजाला झुलवत ठेवायचं आहे का? असा सवालही जरांगे यांनी यावेळी उपस्थित केला.

याशिवाय येत्या काळात धनगर, मुस्लिम आरक्षणासाठी काम करणार असल्याचेही जरांगे यांनी सांगितले आहे. येत्या काळात धनगर, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढा उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाची लढाई जिंकल्यानंतर मराठवाड्यात होतेय 'जरांगे पाटील नगर'

येत्या काळात सग्यासोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळाल्यावर महादिवाळी साजरी करणार आहे. आरक्षणाची लढाई लांब पल्ल्याची असून ती सर्वांना लढावी लागणार आहे. मराठा समाजाचा मागासलेपणा सिद्ध करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यामुळे राज्य सरकारला येत्या काळात सत्याच्या बाजूने उभे राहावे लागणार आहे, असंही जरांगे यांनी यावेळी सांगितलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com