राजू शेट्टींची मोठी घोषणा : स्वाभिमानीचा महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय

महाविकास आघाडीचे आणि आमचे संबंध यापुढे संपले आहेत.
Raju Shetti
Raju ShettiSarkarnama

कोल्हापूर : महायुतीमध्ये यावे यासाठी (स्व.) गोपीनाथ मुंडे यांनी, तर महाआघाडीमध्ये यावे, यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी विनंती केली होती. पण या दोघांनी शेतकऱ्यांची फसवूणक केली आहे. ज्या विश्वासाने आम्ही महाविकास आघाडीत गेलो होतो, तो विश्वास त्यांनी तोडला आहे. त्यामुळे आम्ही आमच्या विचाराने जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाविकास आघाडीचे आणि आमचे संबंध यापुढे संपले आहेत, अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आज कोल्हापुरात केली. (Raju Shetty's big announcement: Swabhimani's decision to withdraw from Mahavikas Aghadi)

हातकंणगले तालुक्यातील चोकाक येथे आज (ता. ५ एप्रिल) झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत माजी खासदार राजू शेट्टी यांनी ही घोषणा केली आहे. या वेळी राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. तसेच, महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बहुमताने घेतला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com