Sugarcane FRP Protest : ऊस दरावरून राजकारण तापलं; मंत्री देसाईंवर शेतकरी संघटनांचा गंभीर आरोप

Swabhimani Shetkari Saghtana Protest : शेतकरी संघटनांकडून चक्काजाम, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड
Shambhuraj Desai
Shambhuraj DesaiSarkarnama
Published on
Updated on

Satara News: राज्यात सध्या ऊस दरासाठी विविध ठिकाणी आंदोलन सुरु आहे. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीवर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. सांगली, साताऱ्यासह विविध ठिकाणी 'स्वाभिमानी'कडून चक्काजाम आंदोलन सुरु आहे.

जोपर्यंत स्वाभिमानी संघटनेच्या मागणीनुसार ऊस दर जाहीर करण्यात येत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तर ऊस दराबाबत सुरु असलेले आंदोलन दडपण्याचा आदेश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्याचा गंभीर आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

सातारा जिल्ह्यात ऊसाच्या दरासाठी सातारा जिल्ह्यात शेतकरी संघटनांनी ठीकठिकाणी चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या टायरमधील हवा सोडली आहे. शेतकरी संघटनांकडून चक्काजाम सुरू असून शेतकरी कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. ऊस दरासाठी शेतकरी संघटनांनी पुकारलेले आंदोलन दडपण्याचा आदेश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shambhuraj Desai
Udayanraje Bhosale on Retirement: उदयनराजे यापुढे निवडणूक लढवणार नाहीत? स्वत:च दिली कबुली; म्हणाले...

बळीराजा शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या कार्यकर्त्यांकडून कराड - चांदोली मार्गावर पाचवड फाटा (ता.कराड) येथे रास्ता रोको करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश शेवाळे यांनी शंभूराज देसाई यांच्यावर आंदोलन दडपण्याचा गंभीर आरोप केला.

तसेच शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस करण्यास सांगितले असल्याचेही त्यांनी म्हटले. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे गणेश शेवाळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवानंद पाटील, चंद्रकांत यादव, उत्तम साळुंखे, बापूराव साळुंखे, सतीश यादव यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ऊस दरासाठी शेतकऱ्यांच्या आंदोलनाने आता मोठे स्वरूप घेतले असून साखर कारखानदारांच्या विरोधात बळीराजा शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. शनिवारी आणि रविवारी सातारा- सांगली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात संघटनेने आंदोलन करत तब्बल 60 ते 70 ऊस वाहतुकीच्या वाहनांच्या चाकातील हवा सोडून देण्यात आली. त्यामुळे बळीराजा आणि स्वाभिमानी संघटनेच्या चक्काजाम आंदोलनाने दोन्ही जिल्ह्यातील साखर कारखानदारांचे धाबे दणाणले आहेत.

दरम्यान, यावेळी जोपर्यंत ऊस दर मिळत नाही, तोपर्यंत उसाची वाहतूक करू नका, अन्यथा वाहनाच्या चाकातील हवा सोडली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. कराड -कासेगाव परिसर, मल्हारपेठ, निसरे फाटा, पाटण -कराड रस्ता, मलकापूर, तासवडे टोल नाका, तांबवे फाटा, पाटण रस्ता- वारूंजी फाटा परिसरात या आंदोलनाने मोठे स्वरूप घेतले आहे. त्यामुळे आता या आंदोलनावर सरकार काय तोडगा काढतं, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Edited by Ganesh Thombare

Shambhuraj Desai
Bachchu Kadu : भूसंपादन मंजुरीसाठी बच्चू कडूंनी नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना नियम दाखवत धरले धारेवर !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com