Vinod Tawde: विनोद तावडे यांनी नेत्यांना फटकारले; मुद्द्यावर बोला!

Vinod Tawde on Declining level politics in Maharashtra Politics: "महाराष्ट्रात राजकीय पक्ष आणि आपले विचार वेगळे असतात. मुद्दांवर सत्ताधारी-विरोधकांनी आपले मत व्यक्त केले पाहिजे. सध्याचे राजकारण हे मुद्दांवर न होता, अन्य गोष्टींवर होत आहे," अशी खंत तावडे यांनी व्यक्त केली.
Vinod Tawde
Vinod TawdeSarkarnama
Published on
Updated on

राजकारणाची पातळी घसरुन जिरवाजिरवीची भाषा सामान्यांच्या कानावर पडते एखाद्या विषयावरुन राजकीय हवा तापवत ठेवत संघर्षाची किनार असणारे कुरघोडीचे राजकारण नेते करीत असतात. असे राजकारण सोडून द्यायला हवे, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिक करीत असतात.

पुरोगामी महाराष्ट्र हा मुद्द्यांच्या राजकारणासाठी ओळखला जातो. पण सध्याच्या राजकारणात तसे होताना दिसत नाही. राज्यातील सध्याच्या राजकारणावर भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी सर्वच पक्षांच्या नेत्यांना फटकारले.

आषाढी वारीमध्ये वाखरी येथे विनोद तावडे हे सहभागी झाले आहेत. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. "महाराष्ट्रात राजकीय पक्ष आणि आपले विचार वेगळे असतात. मुद्दांवर सत्ताधारी-विरोधकांनी आपले मत व्यक्त केले पाहिजे. सध्याचे राजकारण हे मुद्दांवर न होता, अन्य गोष्टींवर होत आहे," अशी खंत तावडे यांनी व्यक्त केली.

" पुरोगामी महाराष्ट्र हा मुद्द्यांच्या राजकारणासाठी ओळखला जातो. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील नेत्यांनी राजकारण झाले पाहिजे," अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली.

गेल्या काही वर्षापासून मी माऊलींच्या पालखीत सहभागी होत असतो. आज मी वाखरी येथे माऊलींच्या पालखीत सहभागी झालो आहे. "राज्यात पाऊस पाणी पडू दे, तमाम जनतेला सुख ,शांती समृद्धी मिळू दे, असे साकडे विठुरायाच्या चरणी घातल्याचे तावडे यांनी सांगितले.

Vinod Tawde
Vinayak Raut: शिवसेना संपवणार, म्हणणारा अजून जन्माला आला नाही; राऊतांचा राणेंवर हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी मंत्री, आमदार राजेश टोपे यांनी काल (रविवारी) ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये सहभाग घेतला. वारकरी पोशाख, हातात टाळ, डोक्यावर फेटा, माऊलींचा जयघोष करणाऱ्या टोपेंनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं होतं. "पांडुरंगाची इच्छा असेल तर मला ही महापूजा करायला आवडेल," असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला होता.

ठाकूर बुवाची समाधी ते तोंडले बोंडले असा प्रवास पालखी बरोबर त्यांनी केला. राजेश टोपे यांनी मृदुंग टाळ वाजवत वारकऱ्यांबरोबर फुगडी खेळली. राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांनी संत तुकोबा-ज्ञानोबा यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होत आहेत, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे नेते यानिमित्ताने जनतेशी संवाद साधत असल्याचे बोलले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com