Devendra Fadnavis : तपोवनातील जमीन मिळाली नाही तर हा कुंभमेळा होणार कसा? CM फडणवीसांचा महाजनांच्या सुरात सूर

Devendra Fadnavis On Tapovan Tree Cutting: नाशिक तपोवन वृक्षतोड वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर त्यांची भूमिका मांडली आहे. इतके दिवस ते अद्याप यावर गप्प होते.
Devendra Fadnavis On Tapovan tree cutting
Devendra Fadnavis,girish mahajan Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिकमध्ये कुंभमेळ्यात साधूंच्या राहण्याची सोय करण्यासाठी तपोवनात साधुग्राम उभारण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी १८०० झाडे तोडण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. पर्यावरण प्रेमींचा वृक्षतोडीला विरोध असताना कुंभमेळामंत्री महाजन यांचे मात्र या वृक्षतोडीला समर्थन आहे. अद्याप मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र यावर भूमिका मांडली नव्हती. परंतु आता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. साम टिव्हीने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

साधरणपणे वृक्षतोड टाळली पाहीजे या बद्दल कुणाचही दुमत असू शकत नाही. फक्त या मुद्द्यावरुन जे राजकारण केले जात आहे. ते राजकीयकरण करणं चुकीचं आहे असं फडणवीस म्हणाले.

फडणवीस पुढे म्हणाले, अनेक वर्षांपासून आपण त्या जागेवर साधुग्राम तयार करतो. तेथील २०१५ व २०१६ ची गुगल इमेज बघितली तर लक्षात येईल की, त्याठिकाणी झाडे नाहीत. २०१७-१८ ला त्याठिकाणी अतिक्रमण होतय या विचाराने महापालिकेने तिथे वृक्ष लावण्याचा प्रस्ताव ठेवला. तेव्हा आपलीही ५० कोटी वृक्षांची स्कीम चालली होती. त्याअंतर्गत पुन्हा १२ वर्षांनी ही जागा आपल्याला कुंभमेळ्यासाठी वापरावी लागेल याचा विचार न करता महापालिकेकडून तिथे वृक्षलागवड करण्यात आली.

साहजिकच लोकांना वाटते की वृक्षतोड केली जाऊ नये. पण प्रशासनासमोरही अडचण आहे. कारण वृक्षतोडलेच नाही तर साधुग्राम कुठे करायचं... ? प्रयागराजचा जो कुंभमेळा होतो तो १५ हजार हेक्टरमध्ये होतो. आणि आपल्याला कुंभमेळा करायचा आहे तो फक्त साडे तीनशे एकरात. आणि तपोवनातली जमीन मिळाली नाही तर हा कुंभमेळा होणार तरी कसा असा प्रश्न उपस्थिीत करत फडणवीस यांनी एकप्रकारे कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या सुरात सूर देखील मिसळवला.

तर दुसरीकडे, कुंभमेळा हा सनातन संस्कृतीचे एक प्रतीक आहे. सनातन संस्कृतीत वृक्ष पर्यावरण याला एक विशेष महत्व दिलं आहे. नदीलाही एक विशेष महत्व आहे. आपण नदीची आराधणा करणारे लोकं आहोत. त्यामुळे वृक्ष तोडून कुंभमेळा कसा करता हा समजही लोकांचा योग्य आहे. त्यामुळे आपल्याला मधला मार्ग काढावा लागेल असही फडणवीस म्हणाले.

जेवढी वृक्ष वाचवता येईल तेवढी वाचवली पाहीजे. ट्रान्सप्लांट करावी लागली तर ट्रान्सप्लांट केले पाहीजे. कुंभमेळाही झाला पाहीजे व जास्तीत जास्त वृक्ष कसे वाचवता येतील हा प्रयत्न केला पाहीजे. फक्त या प्रकरणाचं जे राजकारण केलं जातय ते योग्य नाही. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणू नये. मलातर आश्चर्य वाटतं की जे लोक धर्माला अफूची गोळी म्हणतात तेच लोक जास्त करुन मैदानात दिसत आहेत असा टोला फडणवीसांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com