Nashik politics: मुसळधार पावसाने चारही मंत्र्यांची उडवली झोप! भुजबळांच्या मतदारसंघात प्रचंड नुकसान

Heavy Rains Nashik Chhagan Bhujbal Dada Bhuse : नाशिकमध्ये अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत
Manikrao Kokate, Chhagan Bhujbal & Narhari Zirwal
Manikrao Kokate, Chhagan Bhujbal & Narhari ZirwalSarkarnama
Published on
Updated on

Nashik Heavy Rains News : नाशिक जिल्ह्यात यंदा तिसऱ्यांदा अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यातील 98 महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यातील खरीप पिके दुसऱ्यांदा पाण्याखाली गेली. यापूर्वी केलेल्या पेरण्या आणि त्यावरील शेतकऱ्यांचा खर्च वाया गेला. राज्य शासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार, मंत्र्यांवर नाराजी आहे.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघात प्रचंड हानी झालू असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे, दादा भुसे आणि छगन भुजबळ हे चार मंत्री नाशिक जिल्ह्यात आहेत. मात्र, गेल्या महिन्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्याप पूर्ण झालेले नाही.

गेल्या महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे झालेले नसताना पुन्हा पावसाचा धडाका सुरू आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. कर्जमाफीच्या आणि नुकसानग्रस्तांच्य मदतीसाठी विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शेतकरी आक्रोश मोर्चा काढून राज्य शासनाविरोधात प्रचंड शक्ती प्रदर्शन केले होते. शिवसेना उद्धव बाळासाहबे ठाकरे पक्षानेही राज्य शासनाला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर इशारा दिला होता.

Manikrao Kokate, Chhagan Bhujbal & Narhari Zirwal
Mahayuti secret strategy: महायुतीचा गुप्त डाव उघड; ठाणे-पुण्यातील मैत्रीपूर्ण लढतीमागे 'ही' रणनीती!

नाशिक जिल्ह्यात द्राक्ष उत्पादक अतिवृष्टीने मोठ्या संकटात सापडले आहेत. कांदा पीक यापूर्वीच केंद्र शासनाच्या धोरणाने संकटात सापडले आहे. उत्पादकांचे आर्थिक नुकसान झाल्याने राज्य शासनाविरुद्ध संतापाचे वातावरण आहे. शनिवारी सायंकाळपासून जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू आहे. गोदावरीसह सर्व प्रमुख नद्यांना पूर आला आहे. मुख्य म्हणजे छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवला मतदारसंघात दुष्काळी भागातील नद्यांना ही पूर आला. या पुराने शेती नष्ट झाली आहे.

शेतकरी संतप्त

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पीक गेले आहे. मात्र, पंचनामे आणि मदत शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेली नाही. नाशिक जिल्ह्यात चार मंत्री असताना मदतीला होत असलेल्या उशीरामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यात विरोधक आक्रमक झाले असून सरकारने तातडीने कर्जमाफी करून मदत द्यावी, या मागणीसाठी राजकारण तापले आहे.

Manikrao Kokate, Chhagan Bhujbal & Narhari Zirwal
Maharashtra Flood 2025 : पावसाचा धुमाकूळ; 2019 मधील शहांच्या निर्णयाचा फायदा महाराष्ट्राला कधी? मोदींचंही ठरेना...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com