जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse), आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे एकमेकांवर आरोप करणे, त्याला प्रत्युत्तर देणे, असे वाकयुद्ध वर्षभरापासून सुरू आहे. त्यावर पालकमंत्री गुलाराब पाटील (Gulabrao Patil) म्हणाले, की दोन्ही नेत्यांचे वाकयुद्ध आता नेहमीचेच झाले आहे.
पुर्वाश्रमीचे भाजपधील हे नेते जिल्ह्याच्या राजकारणातील वरचष्मा टिकविण्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करीत आले आहेत. पक्षांतर्गत राजकारण व अन्यायाला कंटाळून श्री. खेडसे यांनी भाजपला रामराम करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ केली. त्यानंतर भाजपकडून त्यांच्या विरोधातील कारवाया वाढल्या. सध्या तर गिरीश महाजन सातत्याने श्री. खडसे यांच्यावर टिका करतात. गेल्या दोन दिवसांत हे शाब्दीक युद्ध अतिशय टोकदार झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिले.
यावेळी श्री. पाटील यांनी, या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र यावे याचा पुनरूच्चार केला.
‘जीएमसी’त (जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय) ते पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. या वाकयुद्धाला महत्त्व देण्याची गरज नाही. दोन्ही नेत्यांकडे चांगला अनुभव आहे. त्यांनी एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र आल्यास त्यांचे स्वागत आहे, असे श्री. पाटील म्हणाले.
दीपक गुप्ता यांना अनिल अडकमोल यांनी हद्दपार करण्याची मागणी केली आहे. त्याशिवाय २६ जानेवारीला पालकमंत्र्यांना ध्वजवंदन करू न देण्याची धमकी त्यांनी दिली आहे. त्यावर पालकमंत्री म्हणाले, की अडकमोल यांची काय मागणी ते मी पाहीन. गुप्ता यांचा हद्दपारीचा प्रश्न माझा नाही.
-----
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.