Pahalgam Terror Attack: भाजप नेते सावजी म्हणतात, 'त्या अमानुष प्रवृत्तींचा बिमोड करावाच लागेल'

Lakshman Savji; The only option now is to dismantle Pakistani tendencies -पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे पाकिस्तानी नागरिकांच्या नागरिकत्वाचा प्रश्न पुढे आला
Laxman Savji
Laxman SavjiSarkarnama
Published on
Updated on

BJP Lakshman Savji News: पहलगाम येथे दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांची हत्या केली. यामध्ये २८ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जगभर त्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. हा प्रकार पारंपारीक दहशतवादापेक्षाही क्रूर आहे.

केंद्र शासनाने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर विविध पावले टाकली आहेत. पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासाच्या आत भारत सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यातून अनेक पेच देखील निर्माण होत आहेत. विशेषतः भारतीय नागरिकांची विवाह केलेल्या महिलांच्या नागरिकत्वाचा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

Laxman Savji
Jayant Patil Politics: संयमी जयंत पाटील यांचाही संयम सुटला, म्हणाले, पहलगाम हल्ला हे केंद्राचे मोठे अपयश!

या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश सचिव लक्ष्मण सावजी यांनी अशा प्रकारे वेगळ्या विचार करणाऱ्या टीकाकारांचा समाचार घेतला आहे. ते म्हणाले, हा पारंपारिक दहशतवादी हल्ला नव्हता. धर्म विचारून जर कोणी हत्या करत असेल, तर त्याचा वेगळा विचार करावाच लागेल.

Laxman Savji
Ajit Pawar Politics: कर्जमाफीच्या प्रश्नावर राष्ट्रवादीच्या अजित पवार पक्षात का आहे गोंधळ?

यापूर्वी दहशतवादी येत आणि जमावावर बंदुकीच्या फेरी झाडून हत्या करीत असत. केंद्र सरकारने त्यावर वेळोवेळी उपाययोजना केल्या. त्या दहशतवादाचाही जगभर आणि मानवतेच्या दृष्टीने निषेधच केला जात होता. आता मात्र नव्या परिस्थितीत हा हल्ला झाला आहे. त्यामुळे त्यावर कठोर कारवाई करावीच लागेल.

माजी पंतप्रधान (कै) अटल बिहारी वाजपेयी हे आपल्या कवितेतून सांगत,

जो हम पर गुजरी व बच्चो के संग न होने देंगे|

हम जंगल होने देंगे||

अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या मृदू स्वभावानुसार पाकिस्तानला अनेकदा कडक शब्दांत कारवाईचे संकेत दिले, इशारे दिले. मात्र तरीही त्याचा काहीही परिणाम न होणाऱ्या व दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्या अमानुष प्रवृत्तींचा विमोड आता करावाच लागेल, असं आता सगळ्यांनाच वाटलं पाहिजे.

भारतात येऊन विवाह केलेल्या व पाकिस्तानच्या नागरिक असलेल्या विवाहित महिलांच्या नागरिकत्वाबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचा वेगळा विचार करता येईल. केंद्र शासन आणि संबंधित यंत्रणा त्यावर निर्णय घेतीलच. मात्र त्याचा अडसर पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरावर होऊ नये.

भारताने आजवर पाकिस्तान आणि भारतात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अनेक उपक्रम केले आहे. अटल बिहारी वाजपेयी यांनी लाहोरची बस देखील सुरू केली होती. मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही हे कारगिलच्या आगळीकीतून दिसून आले.

भारतात अद्यापही अनेक पक्ष आणि नेते अशा वातावरणात आपले राजकारण करतात. त्यांच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी देशाच्या विविध यंत्रणांना किंमत मोजावी लागते. अशा प्रवृत्तींचा देखील वेगळा विचार करून आता त्यांना धडा शिकवला पाहिजे, असे सावजी यांनी सांगितले.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com