Prajakt Tanpure : रुसवे-फुगवे सुरूच; तनपुरे म्हणाले, 'बहुमतानंतरचे सत्तानाट्य जनतेला परवडेना'

Former Minister Prajakta Tanpure Criticizes Mahayuti Leadership : राज्यात महायुतीला बहुमत मिळाले असून, सत्ता स्थापनेला होत असलेल्या दिरंगाईवरून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी टीका केली आहे.
Prajakt Tanpure
Prajakt TanpureSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राज्यात रंगलेल्या सत्ता नाट्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

"राज्यातील जनतेने सत्तानाट्य करण्यासाठी बहुमत दिलेले नाही. केंद्रात सत्ता आहे. राज्यात बहुमत मिळून देखील सत्ता स्थापनेसाठी दहा ते 12 दिवस वाया घालवले. रुसवे-फुगवे, दिल्ली वारीचे नाटके सुरू आहेत", असा टोला प्राजक्त तनपुरे यांनी लगावला.

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघात प्राजक्त तनपुरे आणि भाजपचे (BJP) शिवाजी कर्डिले यांच्या लढत झाली. भाजपचे शिवाजी कर्डिले यांचा विजय झाला. ही लढत अटीतटीची झाली. तनपुरे पराभवानंतर त्यांच्या मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. यावेळी त्यांनी राज्यात सुरू असलेल्या सत्ता नाट्यावर तोफ डागली आहे.

Prajakt Tanpure
Balasaheb Thorat : थोरात विरोधकांवर कडाडले; म्हणाले, 'मीही हिंदू, जातीचे विषारी...'

प्राजक्त तनपुरे म्हणाले, "राज्यात महायुतीला बहुमत मिळाले आहे. परंतु सत्ता स्थापनेला दहा ते 12 दिवसांची दिरंगाई झाली आहे. महायुतीच्या या सत्ता नाट्यामुळे वेळ वाया जात आहे. अडीच वर्षापूर्वी महायुती सत्तेत होती". 50 खोक्यांचा आरोप जनतेने यांच्यावर केले. कांद्याची निर्यातबंदी लादली. शेतमालाला भाव नाहीत.

दुधाचे दर पाडून अनुदान जाहीर केले. त्याचे पैसे देखील नाहीत. एवढी नाराजी असताना देखील महायुतीला (Mahayuti) राज्यातील जनतेने दिलेले बहुमत अनाकलनीय आहे. त्यामुळे जनतेच्या मनात देखील ईव्हीएम मशीनबाबत संभ्रम आहे, असा दावा प्रजाक्त तनपुरे यांनी केला.

Prajakt Tanpure
Balasaheb Thorat : थोरात विरोधकांवर कडाडले; म्हणाले, 'मीही हिंदू, जातीचे विषारी...'

सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी इथं ग्रामस्थांनी बॅलेटवर प्रतिकात्मक मतदानाचा घेतलेला निर्णय यातूनच पुढे होता. ग्रामस्थांच्या या निर्णयाचा धसका महायुतीने घेतला आणि प्रशासनाच्या माध्यमातून तो हाणून पाडला गेला. यामुळे ईव्हीएम मशीनबाबत अधिकच संभ्रम निर्माण होतो, असेही प्राजक्त तनपुरे यांनी म्हटले.

विधानसभेचा निकाल लागून 10 ते 12 दिवसांचा कालावधी लोटला आहे. आमच्या लाडक्या बहिणी 2100 रुपयांच्या प्रतिक्षेत आहेत. आमचा शेतकरी कर्जमाफी व वीजबिल माफीच्या प्रतिक्षेत आहे. जी आश्वासने यांनी निवडणुकीच्या काळात दिली होती, ती या सरकारने लवकर पूर्ण केली पाहिजे. लाडक्या भावांचे अजून पगार झालेले नाहीत.

इतके दिवस सत्ता नाट्यावरून वाया घालवण्यापेक्षा कामाला लागले पाहिजे. रूसवे- फुगवे व दिल्ली दौरे आता नको. राज्यातील जनतेने या नाटकांसाठी बहुमत दिलेले नाही. आता आश्वासन पुर्ततेसाठी महायुतीने कामाला लागावे, असा सल्ला प्राजक्त तनपुरे यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com