Ajit Pawar News : दादांनी दिला बहिणींना पाच वर्षांचा वादा

Political News : आरोप-प्रत्यारोप करून प्रश्न सुटत नाही. काटोल-नरखेडमध्ये कोणी काय केले, काय नाही याच्या तपशीलात आपण जाणार नाही. त्याने तुमच्या समस्या सुटणार नाहीत, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : लाडकी बहीण योजना निवडणुकीसाठी आणली, निवडणुकीनंतर ती बंद केली जाईल, असे आरोप विरोधकांमार्फत केले जात आहेत. अर्थमंत्र्यांच्या या योजनेला विरोध आहे, अशीही टीका केली जात आहे. मात्र,अजित पवार यांनी शनिवारी काटोलमध्ये जाहीर कार्यक्रमात ही योजना पाच वर्षे बंद करणार नाही. हा आपला वादा असल्याचे जाहीर केले. मात्र, त्यासाठी येणाऱ्या काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला निवडून द्यावे लागेल, असेही आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) न्याय सन्मान यात्रेच्या काटोल येथे कार्यक्रमात ते बोलत होते. अजित पवार यांनी आपल्या भाषणात कोणावरच टीकाटीपणी केली नाही. आम्ही कामाचे माणसे आहोत, काम करतो. आरोप-प्रत्यारोप करून प्रश्न सुटत नाही. काटोल-नरखेडमध्ये कोणी काय केले, काय नाही याच्या तपशीलात आपण जाणार नाही. त्याने तुमच्या समस्या सुटणार नाहीत. (Ajit Pawar News )

काटोलमध्ये सूतगिरणी सुरू करण्याची मागणी आहे. ती नक्कची सुरू केली जाईल. जास्त पावसामुळे संत्रा, मोसंबी फळांची मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आहे, असे निवेदन आजच मला प्राप्त झाले. मंचावरूनच अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले. आजच त्याचा आदेश काढण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

छत्रपतींचा पुतळा पडल्याची तसेच बदलापूर येथे मुलींवर अत्याचाराची दुर्दैवी घटना महाराष्ट्रात घटना घडली. संबंधित दोषींनी कारवाई केली जाईल. कोणालाही पाठीशी घातल्या जाणार नाही. चुकीला माफी नाही. मग तो कोणीही असो सोडणार नाही. यापुढे महिला, मुलींवर अत्याचार करणाऱ्याला फाशी दिली जाईल, असेही अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावेळी जाहीर केले.

Ajit Pawar
Rohit Pawar : रोहित पवारांना आठवले 'माफीवीरांचे' कारनामे; मग काय संस्कारसह सर्वच काढलं...

लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा विरोधकांनी फसवी असल्याचा आरोप केला. बहिणींच्या खात्यात पैसा जमा होताच आता निवडणुकीपुरती आहे, असे आरोप करणे सुरू केले. त्यानंतर बहिणींना दिले भावाकडे दुर्लक्ष केले जात आहे, सांगून दिशाभूल सुरू केली, असल्याचे त्यांनी सांगितले.

अजित पवार यांनी बहिणींसोबत, भावासाठी, विद्यार्थ्यांसाठी, मुलींसाठी, शेतकऱ्यांसाठी, मस्लिमांसाठी सुरू केलेल्या योजनांचा पाढाचा वाचला. या सर्व योजना पारदर्शकपणे राबवल्या जात आहेत. कोणी मध्यस्थी नाही. थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com