Farmer Crisis : दिशा सालियन प्रकरणावर प्रश्न; बच्चू कडू म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला!’

Bachchu Kadu shifts focus from Disha Salian case to Maharashtra’s farmer and crop-loss crisis. : दिशा सालियन प्रकरणाची माहिती नसल्याचे सांगत बच्चू कडूंनी महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती, पिकांचे नुकसान आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले.
Bachchu Kadu
Bachchu KaduSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Farmers : दिशा सालियन प्रकरणावरून प्रश्न विचारण्यात आल्यानंतर शिवसेनेचे नेते बच्चू कडू यांनी राज्यातील सध्याच्या दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष वेधले.

दिशा सालियन प्रकरण नेमके काय आहे, याची माहिती नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी महाराष्ट्रातील शेतकरी आणि पिकांच्या नुकसानीवर चर्चा होणे गरजेचे असल्याचे सांगितले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) खासदार संजय राऊत यांनी दिशा सालियन प्रकरणावर भाष्य करताना हे प्रकरण नेपाळी कनेक्शन आणि ठाकरे कुटुंबीयांची बदनामी करण्याच्या कटाशी संबंधित असल्याचा आरोप केला आहे. याबाबत बच्चू कडू यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, "नेमकं काय प्रकरण आहे, हे मला माहिती नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, या विषयापेक्षा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या (Farmer) प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे कडू यांनी सांगितले. "चर्चा झाली पाहिजे, पण महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर झाली पाहिजे. शेतकरी अडचणीत आहे, त्यावर बोलले पाहिजे," अशी भूमिका त्यांनी मांडली.

Bachchu Kadu
Buldhana Drought : दुष्काळावरून बुलढाण्यात राजकारण तापलं; पालकमंत्री ‘हरवले’ म्हणत पोलिसांत तक्रार

राज्यात पाऊस झालेला असला तरी अनेक भागांमध्ये त्याचा शेतीला अपेक्षित फायदा झालेला नाही, असे बच्चू कडू यांनी सांगितले. त्यांच्या मते, पावसाचे पाणी वाहून गेले असून सध्या उष्णतेचा मोठा परिणाम पिकांवर होत आहे. पिके हिरवी दिसत आहेत; मात्र पावसाअभावी पिकांची फळप्रक्रिया खुंटलेली आहे, असे कडू यांनी सांगितले. विदर्भ, मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थितीची छाया असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Bachchu Kadu
Manoj Jarange Protest : जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे शिंदे शिवसेनेतील धुसफूस? माजी सहकाऱ्याचा गंभीर दावा

संत्रा, कापूस, सोयाबीनच्या नुकसानीचा मुद्दा

संत्रा उत्पादकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. संत्र्याच्या फुलांची आणि फळांची गळती वाढली असून, या नुकसानीकडे अद्याप पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचा दावा त्यांनी केला. कापसाच्या बोंडांची गळती आणि सोयाबीन पिकाच्या स्थितीचाही त्यांनी उल्लेख केला. सोयाबीनची शेंग हिरवी दिसत असली तरी पिकावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.

पाऊस आला तर नुकसानीचा अंदाज घेणे गरजेचे

सध्याच्या परिस्थितीत पाऊस झाल्यास उभ्या पिकांचे आणखी नुकसान होण्याची शक्यता असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे योग्य पद्धतीने पंचनामे आणि मूल्यांकन केले पाहिजे, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिशा सालियन प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकीय चर्चेच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी मात्र शेतकरी, दुष्काळ आणि पिकांचे नुकसान हे राज्यासमोरील महत्त्वाचे प्रश्न असल्याचे अधोरेखित केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com