Maratha Agitation : मराठा आंदोलनाच्या यशानंतर मनोज जरांगे-पाटील राजकारणात जातील ?

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे-पाटील यांनी राजकीय पक्षात जाण्याविषयीचा कुठलाही कौल दिला नव्हता.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Sarkarnama
Published on
Updated on

Maratha Agitation : मराठा आरक्षणाच्या विषयावरून मोठा जनाधार असलेले मनोज जरांगे-पाटील यांना आलेल्या यशानंतर ते राजकारणात जातील काय, अशी चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे. लोकसभा निवडणूक असो की, विधानसभा निवडणूक मनोज जरांगे-पाटील यांना सर्वच राजकीय पक्षांकडून मोठी मागणी असणार आहे.

मनोज जरांगे यांच्यासाठी आता सर्वच राजकीय पक्षांची दारे खुली आहेत. पण, याचा निर्णय हा जरांगे-पाटील यांना घ्यायचा आहे. यापुर्वीच त्यांनी कुठल्याही राजकीय पक्षात, राजकारणात जाणार नाही याचे सूतोवाच केले होते. आता मराठा आरक्षणाच्या व्यापक यशानंतर मनोज जरांगे-पाटील यांना आपल्याकडे ओढण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ असणार आहे.

Manoj Jarange Patil
Nagpur NDCCB Bank : ‘पळणारा नाही, भिडणारा नेता’ म्हणत कार्यकर्त्यांचा जल्लोष!

यात कुठला राजकीय पक्ष यशस्वी होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. यापूर्वीच वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे-पाटील यांना ऑफर दिली होती. पण, अद्याप मनोज जरांगे-पाटील यांनी राजकीय पक्षात जाण्याविषयीचा कुठलाही कौल दिला नव्हता. अशा वेळी भविष्यात मनोज जरांगे-पाटील यांच्याकडे सर्वच राजकीय पक्षांची दारे खुली झाली आहेत. त्यामुळे भविष्यात मनोज जरांगे-पाटील हे नेमक्या कुठल्या राजकीय पक्षात जातात हे पाहण्यासारखे ठरेल.

मराठा आरक्षणाच्या विषयावर सर्वच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ आहे. ही चढाओढ पाहता आणि हा सामाजिक मुद्दा राजकीय नेत्यांसाठी निश्चितच चर्चेत ठेवणारा असाच आहे. मराठा आरक्षण टिकविण्यात आणि देण्यात विविध राजकीय पक्षांमध्ये नेहमीच वाद झाले आहे. भाजप नेहमी मराठा आरक्षण आम्ही दिले, असे म्हणते. पण, ते टिकविण्यात महाविकास आघाडी अपयशी ठरल्याचे खापर भाजपा नेहमी फोडते.

मराठा आरक्षणासाठी जिवाचे रान करणारे मनोज जरांगे-पाटील यांची चिकाटी आणि वेळप्रसंगी स्वतःचा जीव गेला तरी मराठा आरक्षण घेण्यासाठी त्यांनी मोठे धाडस दाखविले. मराठा आरक्षण, समाजातील गरिबांसाठीचे प्रेम, मराठा तरुणांना न्याय मिळण्यासाठीची धडपड ही प्रामाणिक होती. त्यामुळे त्यांच्यातील प्रामाणिक हा गुण समाजासाठी प्रेरणादायी ठरला आणि तो समाजाला एकसंघ करण्यात महत्त्वाचा ठरला. त्यांनी मराठा आरक्षण या एकाच विषयावर फोकस करून अंतरवाली येथून निर्माण केलेले आंदोलन हे राज्यभर पोहोचले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आंदोलनाला आज मोठे यश प्राप्त झाले आहे. राज्य सरकारच्या निर्णयामुळे आज लाखो मराठा बांधवांना याचा थेट फायदा होणार आहे. निश्चितच समाजाच्या उत्थानासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी दाखवलेली चिकाटी आणि एकाच विषयावर तो यशस्वी होईस्तोवर उपोषण करत दिलेला लढा हा निश्चितच प्रेरणादायी असाच आहे. त्यामुळे त्यांच्यासारख्या प्रामाणिक सामाजिक कार्यकर्त्याला राजकीय व्यासपीठ मिळाले तर समाजातील इतरही अनेक मुद्दे सोडविण्यात मोलाची मदत होईल. पण, याविषयीचा सर्व निर्णय हा मनोज जरांगे-पाटील यांना घ्यायचा आहे.

Edited By : Atul Mehere

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com