Nana Patole News : 'भारत जोडो'नंतर आता काँग्रेसची 'जनसंवाद पदयात्रा' ; महाराष्ट्र पिंजून काढणार

Congress Jan Samvad Padyatra: अगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस चांगलीच अॅक्टिव झाली आहे.
Nana Patole News
Nana Patole NewsSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Political News: अगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस (Congress) चांगलीच अॅक्टिव झाली आहे. त्यासाठी महाराष्ट्र कॉंग्रेसच्या वतीने ३ सप्टेंबर पासून 'जनसंवाद पदयात्रा' काढण्यात येणार आहे. ही यात्रा प्रत्येक गावात आणि प्रत्येक शहराच्या भागात जाणार, असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

या संदर्भात पटोले यांनी पुर्व विदर्भातील नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री नितीन राऊत, सुनील केदार, राजेंद्र मुळक, आमदार रणजित कांबळे, विकास ठाकरे, अभिजीत वंजारी, प्रतिभाताई धानोरकर, सहशराम केरोटे, राजु पारवे, सुधाकर अडबोले, सुभाष धोटे, माजी मंत्री अनिस अहमद, नाना गावंडे यांच्यासह राज्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

Nana Patole News
MLA Rajesh Tope As Incharge : टोपेंची जबाबदारी वाढली, जयंत पाटलांनी दिला पाच जिल्ह्यांचा भार..

बैठकीनंतर माध्यमांशी बोलतना नाना पटोले (Nana Patole) यांनी केंद्र सरकारवर (Central Government) निशाणा साधला. पटोले म्हणाले, गेल्या दहा वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारने या देशाची जी माती केली संविधानिक व्यवस्थेला संपवले या देशाला बेरोजगारांचा देश बनवला, शेतकऱ्यांना आत्महत्या करायला परावृत्त केले आहे, असे गंभीर आरोप त्यांनी केले.

महागाई वाढवली, मुठभर लोकांसाठी हा देश चालवला जात आहे. या सगळ्या गोष्टींची जनतेमध्ये चीड आहे. त्यांच्या भावना समजून काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पूर्ण महाराष्ट्रात जाणार आहे. या सरकारच्या योजना कशा बोगस आहेत. जनतेला लुटून व्यापारी लोकांना मोठे केले जात आहे. डीजल, पेट्रोलवर शेतकऱ्यांच्या नावाने कर घेतला जातो. वेगवेगळ्या मार्गाने पैसे जमा केले जात आहेत. अठरा कोटीचा रस्ता अडीचशे कोटीमध्ये कसा केला जातो. हे कॅगच्या रिपोर्ट मधून समोर आले. ज्याचे अध्यक्ष प्रधानमंत्री आहे, त्यांचे सरकार आणि मंत्री कसे भ्रष्टाचारी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या यात्रेच्या माध्यमातून करणार असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले.

Nana Patole News
Injustice to Sangram Thopte : आमदार संग्राम थोपटेंवर आमच्याकडून अन्याय झाल्यासारखं वाटतंय; काँग्रेस नेत्याची कबुली

शेतकऱ्यांना फसवले जात आहे, या सगळ्या गोष्टीची पोल खोल यात्रेच्या माध्यमातून करणार आहोत. आता त्यांच्याजवळ कुठलेही चेहरे बाकी राहिलेले नाही. भाजप जवळचे सगळे चेहरे संपले आहे. भाजपचा (BJP) खोटारडेपणाचा बुरखा फाटलेला आहे. त्यामुळे मुद्द्यापासून डायव्हर्ट करण्यासाठी त्यांनी जे मुद्दे आणले त्यावर कोणीही विश्वास करायला तयार नाही, असा हल्लाबोल पटोले यांनी केला.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com