अजित पवार मुख्यमंत्री होणार की नाही : शरद पवार यांनी केला पहिल्यांदाच खुलासा

अजित पवार यांच्यावर पडलेल्या छाप्यांबद्दल पवार यांनी दिले जाहीर स्पष्टीकरण.
Sharad Pawar
Sharad Pawar sarkarnama

पिंपरी-चिंचवड : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर छापे का पडत आहेत, याबद्दल अनेक तर्क लावले जात होते. विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अडीच वर्षांची टर्म संपल्यानंतर अजित पवार हे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यावर केंद्रीय यंत्रणा छापे टाकत आहेत का, असा प्रश्न शरद पवार यांना पत्रकारांनी आज विचारला. त्याला पवार यांनी त्यांच्या स्टाईलने उत्तर दिले.

Sharad Pawar
शरद पवारांच्या मेळाव्याआधीच राष्ट्रवादीचा हल्लाबोल

ते म्हणाले, ``महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व हे उद्धव ठाकरे यांनी करावे, असे आम्ही तीन पक्षांनी मिळून ठरवले आहे. त्यामुळे इतर कोणत्या नावाचा विचार आम्ही केलेला नाही. त्यामुळे त्यांच्याऐवजी दुसरे कोणी या पदावर येणार नाही.`` इतक्या स्पष्ट शब्दांत त्यांनी ठाकरे हेच मुख्यमंत्रिपदी कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांना मुख्यंमंत्री करण्यासाठी मी स्वतः आग्रही होतो. याचा किस्सा त्यांनी या निमित्ताने पुन्हा सांगितला. महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेपूर्वीच्या बैठकांचा त्यासाठी त्यांनी उल्लेख केला. या सरकारचे नेतृत्व कोणी करावे, यासाठी आमच्याकडे दोन-तीन नावे होती. मात्र आमदारांच्या एका बैठकीत उद्धव ठाकरे हे माझ्या शेजारी बसले होते. त्यांचा हात मी स्वतः वर केला आणि ठाकरे हे आपल्या सरकारचे नेतृत्व करतील, असे जाहीर केल्याची आठवण त्यांनी या निमित्ताने सांगितले. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात अनेकांचा सहभाग होता. त्यात माझाही किंचित वाटा होता, असे त्यांनी मिश्किलपणे सांगितले.

Sharad Pawar
'शरद पवार कधीच सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले नाहीत';पाहा व्हिडिओ

अजित पवार आणि त्यांच्या बहिणींकडे पडलेल्या छाप्यांबद्दल त्यांनी पुन्हा नाराजी व्यक्त केली. या छाप्यांतून काही निष्पन्न होणार नसल्याचा दावा त्यांनी केला. या तिघींकडे पाच-सहा दिवस छापेमारी होणे योग्य नव्हते. तेच-तेच प्रश्न त्यांना विचारले जात होते. मध्यमवर्गीय माणसाला एकाच वेळी आपल्या घरात 15 जणांना अकोडोमेट करणे अवघड होते. आमचे काम संपलय, असे ते अधिकारी सांगत होते. तरी त्यांना फोन येत होते, तुम्ही येथेच थांबा. एखाद्या मुलीचे घरी इतके लोक छाप्यासाठी पाठविणे, दबाव आणणे, अजितदादांचे नाव आहे का, काही माहिती आहे का, असे प्रश्न सतत विचारले गेले. चौकशी केल्यानंतर पाहुणचार घेण्यासाठी त्यांनी इतका काळ थांबायला नको होत, असे मत त्यांनी व्यक्त केले. या यंत्रणांचा गैरवापर असल्याचे मत त्यांनी स्पष्टपणे नोंदविले.

ज्यांनी छापे टाकले किंवा कारवाई केली त्या यंत्रणांनी खुलासे करावे. मात्र या ठिकाणी भाजपचे नेते खुलासा करण्यासाठी पुढे येतात. या खात्याच्या मंत्र्यांनी, अधिकाऱ्याने भाष्य केले तर समजू शकतो. मात्र भाजपचे नेते अशा कारवायांचे समर्थन करण्यासाठी पुढे येतात. महाराष्ट्र सरकारला दोन वर्षे व्हायला आली. हे सरकार टिकणार नाही, असे सांगत होते. मी येणारच असे जे सांगत होते ते येणार नाही, असे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com