Raju Patil News : खड्डे भरण्याच्या कामात ४० टक्के लाच; मनसेचे आमदार राजू पाटलांचा गंभीर आरोप

MNS News : कल्याण-डोंबिवली शहरात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
raju patil News,
raju patil News, sarkarnama
Published on
Updated on

Kalyan-Dombivli News : खड्डे भरण्याच्या कामात ४० टक्के लाच घेतली जाते, असा धक्कादायक आरोप करुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) आमदार राजू पाटील यांनी एकच खळबळ उडऊन दिली आहे. ठाण्याचे आयुक्त चांगले काम करतात. मात्र, इथल्या अधिकाऱ्यानी कल्याण डोंबिवलीला निसर्गावर सोडले, पालिका ऑटो मोडवर सुरू असल्याची टीका पाटील यांनी केली.

कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivli) शहरात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा बळी गेला. खड्डे भरण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाल्याचा दावा महापालिकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र हे काम संथ गतीने सुरू आहे.

raju patil News,
Pimpri Chinchwad Corruption : पिंपरी पालिकेतील गैरव्यवहारात मुख्यमंत्र्यांनी घातले लक्ष; आयुक्तांना मागितला अहवाल

त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहेत. याबाबत बोलताना आमदार पाटील म्हणाले, ही शरमेची बाब आहे. दरवर्षी खड्डे भरण्यासाठी टेंडर काढले जातात. रस्त्याच्या कामात ४० टक्के लाच घेतली जाते. त्यामुळे ठेकेदारावर नियंत्रण नाही. कामात दर्जा नाही. कोणतीही अद्यावत यंत्रणा पालिकेकडे नाही, नसल्याचेही त्यांनी सांगितले.

इच्छा शक्तीचा भाग आहे. ठाण्याचे (Thane) आयुक्त चांगले आहेत, नवी मुंबईत देखील त्यांनी चांगले काम केले. मात्र, कल्याण-डोंबिवलीला निसर्गावर सोडून दिले आहे. अशा शब्दांत त्यांनी आयुक्तांवर सडकून टीका केली. डोंबिवलीमध्ये मोठा गाव माणकोली पूलाला जोडणारे रस्ते तयार नाहीत. पूल सुरु झाल्यास डोंबिवलीकराना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार नाही, असेही पाटील म्हणाले.

raju patil News,
Jalgaon Politics : सत्तासंघर्षातील 'तो' फंडा वापरून जळगाव महापालिकेच्या नगरसेवकांनी आपल्याच नेत्यांना आणलं अडचणीत

निवडणुकीच्या तोंडावर मोठा गाव माणकोली पूल खुला करतील. मात्र, पुलाला साईट रस्ते तयार नसल्याने डोंबिवलीकराना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार लागत आहे. आमदार पाटील यांनी डोंबिवली मानकोली पुलाची पाहणी केली. त्यांनी माणकोली पूल तयार झाला तरी पुलावरुन जाणार कसे असा सवाल उपस्थित केला. कारण रस्ते अजून तयार नाही. त्याचे नियोजन नाही. हे रस्ते आधीच तयार करणे गरजेचे होते. निवडणुकापर्यंत हे काम सुरू ठेवल्याचा आरोप पाटील यांनी केला.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com