कंगनाचे आता थेट न्यायाधीशांवरच गंभीर आरोप

न्यायालयाने तंबी दिल्यानंतर खटल्याच्या सुनावणीस कंगना हजर झाली होती. आता तिने थेट न्यायाधीशांवरच गंभीर आरोप केले आहेत.
Kangana Ranaut
Kangana Ranaut Sarkarnama

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) सध्या वेगवेगळ्या खटल्यांमुळे चर्चेत आहे. प्रसिध्द गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी कंगनाविरूध्द मानहानीचा खटला दाखल केला आहे. या खटल्याच्या सुनावणीस कंगना हजर राहत नव्हती पण न्यायालयाने तंबी दिल्यानंतर ती हजर झाली होती. आता तिने थेट न्यायाधीशांवरच गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

अंधेरी महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयावरील विश्वास उडाल्याचे कंगनाने म्हटले आहे. या न्यायाधीशांनी अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोपही कंगनाने केला आहे. हा खटला दुसऱ्या न्यायालयाकडे वर्ग करावा, अशी मागणी तिने केली आहे. आज यावर मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर सुनावणी झाली. कंगनाच्या वकिलांनी म्हणणे मांडण्याची परवानगी मागितली. यावर न्यायालयाने नकार दिला. आधी कंगनाने ज्यांच्यावर आरोप केले त्या न्यायाधीशांचे मागवण्यात आले आहे. त्यांचे म्हणणे आल्यानंरतच सुनावणी होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

जावेद अख्तर यांच्या वकिलांनी या प्रकरणी न्यायालयात लेखी म्हणणे सादर केले आहे. कंगनाही खटल्याच्या कामकाजास विलंब लावण्यासाठी न्यायाधीशांवर आरोप करीत आहे. यामुळेच तिने खटला दुसऱ्या न्यायालयात वर्ग करण्यासाठी अर्ज केला आहे. कंगनाही याआधी सुनावणीलाही हजर राहत नव्हती. तिचा उद्देश केवळ खटल्याचा कामकाजाला वेळ लावणे हाच आहे. त्यामुळे तिचा अर्ज फेटाळून लावावा, असे त्यांनी म्हटले आहे.

कंगनाविरोधात अटक वॉरंट काढण्याचा इशारा न्यायालयाने नुकताच दिला होता. मुंबईतील अंधेरी येथील महानगर न्यायादंडाधिकाऱ्यांसमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणीवेळी कंगनाच्या वकिलांनी ती देशात नसल्याने सुनावणीला येणार नाही. त्यामुळे हज राहण्यापासून सवलत मिळावी, अशी मागणी केली होती. त्यावर जावेद अख्तर यांचे वकील जय भारद्वाज यांनी त्यावर आक्षेप घेतला होता.

Kangana Ranaut
मोदी सरकारच्या काळात पेट्रोल, डिझेलचीही ऐतिहासिक कामगिरी

कंगना एकाही तारखेला हजर न झाल्याने तिच्याविरोधात वॉरंट काढण्याची मागणीही भारद्वाज यांनी केली होती. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश आर. आर. खान यांनी कंगनाला सुनावणीच्या दिवसापुरते हजर न राहण्याची सवलत दिली. पण पुढील तारखेला त्या हजर न झाल्यास जामीनपात्र वॉरंट काढले जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. यामुळे कंगना मागील सुनावणीला हजर राहिली. दरम्यान, अंधेरीतील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सुरु केलेल्या अवमान खटल्याच्या कारवाईला कंगनाने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने योग्य प्रकारे हा निर्णय घेतला नाही, असा दावा कंगनाने केला होता. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश रेवती मोहिते डेरे यांनी कंगनाची ही याचिका रद्दबातल ठरवली होती.

Kangana Ranaut
दिग्विजयसिंहांनी राज्यपालांकडे जाऊ न दिल्याने सत्ता गेली! माजी मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट

काय आहे प्रकरण?

कंगनाने अर्णब गोस्वामी यांना दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर हे बॅालिवूडमधील सुसाईड गँगमध्ये सहभागी होते. काहीही केले तरी ते मोकळे सुटू शकतात, असे म्हटले होते. तिच्या या आरोपांमुळे आपली प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप जावेद अख्तर यांनी केला होता. कंगनाची चौकशी करण्यासाठी पोलीस तिला वारंवार समन्स बजावत होते. परंतु. ती त्याला उत्तर देत नव्हती. या प्रकरणात कंगना एकदाही न्यायालयात सुनावणीला हजर राहिलेली नव्हती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com