Nana Patole News: चव्हाण आता काँग्रेसमध्ये नाहीत, त्यावर चर्चा नको : पटोले; जागावाटपाच्या घोळाला चव्हाणच जबाबदार...

Maharashtra Lok Sabha Election2024: सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघावर त्यांनी दावा केला आहे. त्यामुळे पक्षांतर करण्यापूर्वी अशोक चव्हाणांनी जाणीवपूर्वक हा घोळ करून ठेवला का, असा संशय आता काँग्रेसचे काही नेते व्यक्त करीत आहेत
Maharashtra Lok Sabha Election2024
Maharashtra Lok Sabha Election2024Sarkarnama

महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी लोकसभा निवडणुकीत जागावाटपाचा तिढा अद्याप संपलेला नाही, याला काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) जबाबदार आहेत, असा आरोप आघाडीतील (Mahavikas Aghadi) काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी केला आहे.

काँग्रेस सोडताना अशोक चव्हाणांनी काँग्रेसचाच 'करेक्ट कार्यक्रम' केला. तीन जागा मित्रपक्षाला सोडल्याने महाविकास आघाडीला पेचात टाकले असल्याचे बोलले जाते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी यावर चर्चा करणार नसल्याचा पुनरुच्चार केला आहे. अशोक चव्हाण हे आता आमच्या पक्षात नाहीत, त्यामुळे त्यावर चर्चा करणार नाही, असे सांगत पटोलेंनी चव्हाणांवर बोलणे टाळले.

चव्हाण यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघात मतदार त्यांना सवाल विचारून माघारी पाठवत असल्याचे पटोलेंनी सांगितले. ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेसच्या काही पारंपरिक मतदारसंघावर दावा केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघावर त्यांनी दावा केला आहे. त्यामुळे पक्षांतर करण्यापूर्वी अशोक चव्हाणांनी जाणीवपूर्वक हा घोळ करून ठेवला का, असा संशय आता काँग्रेसचे काही नेते व्यक्त करीत आहेत. कोल्हापूर, रामटेक आणि अमरावती या मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा होता, पण हे मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आल्यामुळे सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईचा पेच वाढला आहे.

Maharashtra Lok Sabha Election2024
Rana Vs Wankhede: अनेक वर्षांनंतर भाजप-काँग्रेस आमने-सामने; नवनीत राणा Vs वानखेडेंत चुरशीची लढत

आघाडीच्या जागावाटपाच्या पेचाला अशोक चव्हाण जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांकडूनच केला जातो. काँग्रेस नेत्यांची खासगीत अशी चर्चा सुरू होती. महाविकास आघाडीमधील जागावाटपाच्या प्राथमिक चर्चेत अशोक चव्हाणांची भूमिका महत्त्वाची होती. या चर्चेदरम्यान त्यांनी काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघावर दावा करण्याऐवजी इतर मतदारसंघावर दावा केला.

अशोक चव्हाणांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. "मी राजीनामा देऊन दीड महिन्याचा कालावधी झाला आहे. 12 फेब्रुवारीला मी राजीनामा दिला आहे. तेव्हा कुठंही जागावाटप अंतिम झालं नव्हतं. काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्टपणं भूमिका घ्यायला हवी होती. भिवंडीसारख्या महत्त्वाच्या जागेवर राष्ट्रवादी दावा करत आहे. मुंबईत काँग्रेसला एकच जागा मिळत आहे. काँग्रेसची केविलवाणी अवस्था झाली आहे," असे चव्हाण यांनी म्हटलं आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com