Arnav Khaire: अर्णव खैरे कुटुंबाच्या भेटीनंतर चित्रा वाघ संतप्त! ठाकरे बंधूंवर हल्लाबोल; तुमची मुलं पार्ट्यांमध्ये मराठी बोलतात का?

Chitra Wagh on Arnav Khaire Death: 'भाषेवरच असुरी प्रेम थांबवा… आता तरी सुधरा,' असा सल्ला देत चित्रा वाघ यांनी या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
Chitra Wagh on Arnav Khaire Death:
Chitra Wagh on Arnav Khaire Death:Sarkarnama
Published on
Updated on

Dombivli News: मराठी-हिंदी भाषा वादावरुन अर्णव खैरे या तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. भाजप नेत्या व आमदार चित्रा वाघ यांनी आज खैरे कुटुंबाची भेट घेऊन या संपूर्ण घटनेबाबत संताप व्यक्त केला. “अर्णव हा भाषा-विषयक विषारी राजकारणाचा पहिला बळी आहे. तुमच्या मुलांच्या राजकीय भविष्याचा पाया रचण्यासाठी एका मराठी मुलाचा बळी घेणार का?” असा सवाल त्यांनी नाव न घेता ठाकरे बंधूंना केला आहे.

अर्णव प्रकरणाने निर्माण झालेल्या भाषा-वादाच्या सावटावर तीव्र नाराजी व्यक्त करत, “भाषेवरच असुरी प्रेम थांबवा… आता तरी सुधरा,” असा सल्ला देत वाघ यांनी या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

आमदार वाघ म्हणाल्या, “अर्णव हा हुशार, अभ्यासू मुलगा होता. फक्त एका हिंदी वाक्यावरून त्याला मारहाण करण्यात आली आणि त्या धक्क्यातून त्याने आत्महत्या केली. भाषा संवादाचे साधन आहे की वादाचे, हाच खरा प्रश्न आहे. मराठी मुलगा, मारणारेही मराठी—काय साध्य केले याने? एक कुटुंब यातून उद्ध्वस्त झाल.”

Chitra Wagh on Arnav Khaire Death:
Sangamner News: संगमनेरमध्ये महायुती फुटली! नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या माजी नगरसेविकेची बंडखोरी

भाषेच्या नावावर पेरलेले विष…’

“काही नेते त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी, त्यांच्या मुलांचे राजकीय भविष्य उज्ज्वल करण्यासाठी भाषेच्या नावावर विष पेरत आहेत. त्याचा पहिला बळी अर्णव ठरला आहे. कथित मराठी अभिमान दाखवणारे नेते त्यांची स्वतःची मुलं पार्ट्यांमध्ये जातात, तेव्हा मराठी बोलतात का? मग दुसऱ्या भाषेचा एवढा द्वेष का?” असा सवाल करत वाघ यांनी भाषिक वादावर प्रहार केला.

‘आई म्हणून मला यातना जाणवतात’

खैरे कुटुंबीयांची भेट घेताना चित्रा वाघ भावुक झाल्या. “एका आईने मुलाला गमावले, त्या आई-वडिलांची अवस्था पाहवत नाही. आई म्हणून माझ्या मनात वेदना आहेत. एखाद्याचा जीव घेऊन मराठी अस्मिता वाढवणार का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आरोपी पकडले जातील – वाघ

या प्रकरणातील सर्व आरोपी 100 टक्के पकडले जातील. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निश्चित कडक कारवाई करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “मी आरोप करीत नाही, परिस्थिती स्वतः बोलते. या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सणसणीत चपराक द्यावीशी वाटते,” असे वाघ म्हणाल्या.

वडेट्टीवारांवर हल्लाबोल

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. “‘तुंण-तुंण’ वाजवणाऱ्यांनी राजकारणातून वेळ काढून अर्णवच्या घरी भेट द्यावी. उत्तरे तिथेच मिळतील,” असा टोला त्यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com