Mumbai News : मागील अनेक दिवसांपासून राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. अखेर मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. फडणवीसांनीही राजीनामा स्वीकारला आहे. फडणवीस सरकारमधील हा पहिला राजीनामा असल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर फडणवीस यांनी मीडियासमोर यावर शिक्कामोर्तब केले. त्यांनी केवळ चार वाक्यातच हा विषय संपवला. ते म्हणाले, आज राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे. पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारून त्यांना मुक्त करण्यात आले आहे.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपत्रामध्ये हत्येचे अनेक फोटो व व्हिडीओ जोडले आहेत. हे फोटो सोमवारी सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले. त्यानंतर पुन्हा एकदा मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता. अखेर आज त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
देशमुख हत्याप्रकरणी मुंडे यांचे निकवर्तीय वाल्मिक कराड आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. तेव्हापासून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. भाजपचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह विरोधी पक्षांतील नेत्यांकडून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती.
नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरत होती. त्यामध्ये बीडमधील लोकप्रतिनिधी सर्वाधिक आग्रही होते. करूणा मुंडे यांनीही सोमवारीच धनंजय मुंडे राजीनामा देतील, असे भाकित वर्तवले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.