`सागर` किनारे : जब मिले बैठेंगे तीन यार! नाना, फडणवीस आणि थोरात

फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या `सागर` बंगल्यावर तीन नेत्यांची खलबते..
Nana Patol-Fadnavis
Nana Patol-Fadnavissarkarnama

मुंबई : ठाकरे सरकार आणि भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांमध्ये रोज नव्या वादा तोंड फुटत असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि 'भाजपला योग्य वेळी, योग्य मदत करण्याचा शब्द, पटोले यांनी फडणविसांना दिला.

भविष्यातील सहकार्याची हमी देताना, आता राज्यसभा पोटनिवडणुकीतून उमेदवार मागे घेण्याची गळही पटोलेंनी फडणवीस यांना घातली. 'एखाद्या सदस्याच्या निधानाने रिक्त झालेल्या जागेवर विरोधकांनी उमेदवार देऊ नये. अशा स्थितीत कॉंग्रेस भाजपलाही सहकार्य करेल,' अशी भूमिका घेतल्याचे पटोले यांनी 'सरकारनामा'शी बोलताना स्पष्ट केले. मात्र, इतर कोणतीही मदत करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि कोअर कमिटीतील सदस्यांशी चर्चा करून निर्णय कळविणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले.

Nana Patol-Fadnavis
रजनी पाटलांसाठी बाळासाहेब थोरात घालणार भाजपला साकडे

काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रजनी पाटील यांना उमेदवारी अर्ज भरला आहे. अशा पोटनिवडणुका बिनविरोध करणाऱ्याची परंपरा असल्याचे सांगत, भापजने माघार घेण्याची अपेक्षा कॉंग्रेस नेत्यांची आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचीही भूमिका सारखीच आहे. परंतु, भाजपचे संजय उपाध्याय यांनी अर्ज भरल्याने निवडणूक होण्याचे संकेत आहेत. तर पक्षातील वरिष्ठांचा निवडणूक लढण्याची आग्रह असल्याचे माघार नाही, असे भाजप नेत्यांनी बुधवारी रात्री सांगितले होते. या पार्श्वभूमीवर पटोले आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुंबईतील `सागर` या निवास्थानी फडणवीस यांची भेट घेतली. तेव्हा राज्यभसा पोटनिवडणुकीच्या दृष्टीने या तिघा नेत्यांमध्ये चर्चा झाली.

पटोले म्हणाले, "महाराष्ट्रात राजकीय संघर्ष होत असला तरी, नेमक्या कोणत्या काळात विरोधकांना कशी मदत करायची असते, याचे काही अलिखित संकेत आहेत. ते पाळले जावेत, याचसाठी फडणवीस यांची भेट घेतली. ही निवडणूक होऊ नये, अशी मागणी आहे. त्यावर तुर्तास तरी विचार करून निर्णय घेण्याची भूमिका फडणवीस यांनी घेतली आहे. त्यांच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत असेल. यापुढच्या काळात भाजपला अशाच स्वरुपाच्या मदतीची गरज भासल्यास ती केली जाईल."

राज्यसभा पोटनिवडणुकीवरूनही महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमधील संघर्षाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे, ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी काँग्रेस नेत्यांनी फोनवरून चर्चा करण्याची भूमिका घेतली. त्यानंतर प्रसंगी भाजप नेत्यांची भेट घेऊ, असेही सांगितले होते. यानुषंगाने पटोले, थोरात, फडणवीस यांच्या भेटीकडे लक्ष लागले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com