जयदत्त क्षीरसागर यांनी दगाफटका सुरु केला होता : नबाब मलिक  

-
malik-kshirsagar
malik-kshirsagar
Published on
Updated on

मुंबई : जयदत्त क्षीरसागर यांनी दगाफटका सुरु केला होता.उघड शत्रू चांगला असतो.  ते आज उघड झाले हे चांगले झाले, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी यांनी साम  वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले . 

नबाब मलिक यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला . ते म्हणाले, "  पक्षाने त्यांना मंत्रिपदापासून सर्व महत्वाची पदे दिली होती पण जयदत्त क्षीरसागर यांनी निर्लज्जपणाने राजीनामा दिला आहे. जयदत्त सागर यांचे भाऊ आमच्या पक्षात आहेत त्यांची ताकत आहे.जयदत्त क्षीरसागर यांची बीड मध्ये ताकद  राहिली नव्हती. जयदत्त क्षीरसागर यांचा सत्तेसाठी सर्व आटापिटा सुरू आहे. बीड मधून जयदत्त क्षीरसागर निवडणूक येऊ शकत नाहीत. "

देशात एन डी ए ला बहुमत मिळत नाही असा ठाम दावा करीत नबाब मलिक पुढे म्हणाले, " भाजपला झुकते माप देण्यासाठी एक्झिट पोल दाखवला जात आहे.लोकांची व्हीव्ही पॅडने मतांची मोजणी करावी अशी मागणी होती. पण निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचे काम करत आहे. लोकांच्या मनात शंका उपस्थित करण्यास निवडणूक आयोग कारणीभूत आहे." 

एका प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, "  शरद पवार यांनी पंतप्रधानपदाचा दावा नसेल असे आधीच सांगितले आहे. एनडीए बहुमत सिद्ध करू शकली नाही तर शरद पवार महाआघाडीची सत्ता स्थापन करून दाखवतील."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com