शिंदे गट मनसेत विलीन होणार? राज ठाकरे म्हणाले....

Raj Thackeray|CM Eknath Shinde| देवेंद्र फडणवीसांच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी गाठीभेटीही वाढल्या आहेत.
Raj Thackeray|CM Eknath Shinde|
Raj Thackeray|CM Eknath Shinde|

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५० आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत (Shivsena) उभी फुट पडली. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. मात्र सर्वोच्च न्यायालयात हे सरकार कायद्याच्या कसोटीवर टिकणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सरकार टिकवायचे असेल तर एखाद्या पक्षात विलीन व्हावे लागेल, असा दावा करण्यात येत आहे. अशात शिंदे गट मनसेत विलीन होण्याच्या चर्चाही सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याशी गाठीभेटीही वाढल्या आहेत.

यावर खुद्द राज ठाकरे यांना विचारले असता, शिंदे गटाने मनसे पक्षात विलीन व्हायचा प्रस्ताव दिला तर आम्ही विचार करु, असे मनसे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलखातीत त्यांनी हे भाष्य केलं आहे. शिंदे गटातील आमदार माझे जुने सहकारी आहेत. याआधी त्यांनी माझ्यासोबत काम केलं आहे.मला याबद्दल फारशी माहिती नाही. पण उद्या शिंदे गटाकडून प्रस्ताव आला तर मी नक्की विचार करेन,” असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. पण माझ्यासाठी सर्वात आधी माझा महाराष्ट्र सैनिक असेल आणि बाकी सगळे नंतर असतील, असेही राज ठाकरेंनी स्पष्ट केले.

Raj Thackeray|CM Eknath Shinde|
सत्तांतराचे परिणाम... चांगल्या अधिकाऱ्यांच्याही होताहेत बदल्या!

याच वेळी त्यांनी शिवसेना सोडण्याच्या निर्णयावर आणि शिवसेनेच्या नेतृत्वावरही भाष्य केले. “मी बाळासाहेब ठाकरे यांना पत्रंही लिहिली होती. मी फक्त एकच गोष्ट विचारत होतो की माझा जॉब काय असेल? आपण इतरावंर सर्व जबाबदारी देणार आणि मला फक्त निवडणुकीच्या भाषणासाठी बाहेर काढणार. दुसऱ्यांच्या जीवावर मी माझा शब्द टाकणे हे मला शक्य नव्हतं. शिवसेना पक्षप्रमुख पदाचा निर्णय बाळासाहेब ठाकरेंनी घेतला होता. महाबळेश्वरला असताना मी त्यांना म्हटलं होतं की, तुमच्या मनात काय आहे, हे मला माहिती आहे. उद्धव ठाकरेंना तुम्ही अध्यक्ष करा. पण जाहीर मला करु द्या. कारण मग राज की उद्धव हा विषय बंद होईल. त्याप्रमाणे मी विषय बंद केला. पश्चात्ताप करण्याचा विषयच नव्हता.” असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

राज्यात सत्तासंघर्षानंतर शिंदे सरकार अस्तिवात आले, पण शिवसेना कुणी फोडली याबाबत चर्चा अजूनही सुरु आहे. 'भाजप, देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांनी शिवसेना फोडली,' असा आरोप केला जात आहे. या आरोपांना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज उत्तर दिले. राज ठाकरे म्हणाले, "बंडखोर आमदारांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप-प्रत्यारोप केले, त्यांच्यावर हल्लाबोल केला. पण शिवसेना फुटली याला संजय राऊत जबाबदार नाही, मी समजू शकतो ते सकाळी टीव्हीवर येतात,त्यांची ती स्टाईल, त्यांचा तो अहंकार, यामुळे माणसं वैतागली, राऊत रोज तेच तेच बोलतात, असे लोकही म्हणू लागले. पण ते तेवढ्यापूरतं होतं, राऊतांमुळे आमदार फुटले नाहीत, त्याचे श्रेय उद्धव ठाकरेंना आहे,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com