
Maharashtra Politics : शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो अधिवेशन काळातच बाहेर कसे आले, याच्या टायमिंगवरून महायुती सरकारला घेरलं आहे.
धनंजय मुंडे यांचा झाला. पण राजीनामा नेमका काय कारणाने दिला, त्याचे उत्तर आले पाहिजे. या गोष्टी सगळ्या अधिवेशन काळातच का? अन् कशा बाहेर आल्या? दोन-एक महिने अगोदरच होत्या, तर मग बाहेर का आल्या नाहीत? बाहेर आल्या होत्या अन् त्यांच्यापर्यंत पोचल्या असतील, त्याचवेळी त्यांचा राजीनामा का घेतला गेला नाही? असे प्रश्न करत उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारला घेरलं.
मुंबईत महायुती (Mahayuti) सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीडमधील नेते धनंजय मुंडे यांनी प्रकृती अस्वस्थतेचे कारण देत राजीनामा दिला आहे. बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो काल समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यावर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. आणि त्यानंतर आज मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
शिवेसना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचे व्हायरल झालेले फोटो अन् मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याच्या टायमिंगवरून महायुती सरकारला चांगलंच घेरलं. उद्धव ठाकरे म्हणाले, " फोटो, व्हिडिओ काल बाहेर आले, ते सरकारकडे पूर्वी आले होते की नव्हते? रोजच भानगडी बाहेर येत आहे. मुख्यमंत्री पारदर्शी कारभार करत असतील, तर स्वागत आहे. पण असा कारभार करताना, त्यांचे कोणी हात बांधत आहे का?"
'समाज माध्यमांवर व्हायरल झालेले फोटो अगोदर त्यांच्याकडे आले होते की नव्हते, यावर बोलताना, उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अन् गृहमंत्री देखील आहे. त्यांनाच हा प्रश्न विचारला पाहिजे. डिसेंबरपासून प्रकरण गाजत आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याचे कारण दिले आहे, ते प्रकृतीचे! पण नेमकं खरं कारण काय आहे?', असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
'नेमकं खरं कारण काय? धनंजय मुंडे यांनी सांगितले की, प्रकृती अस्वस्थामुळे राजीनामा दिला आहे. त्याचवेळी अजितदादा यांनी नैतिकतेच्या आधारावर दिला, असे सांगत आहेत. पण खरं कारण काय? जर त्यांनी प्रकृती अस्वस्थामुळे दिला असेल, तर एवढे फोटो अन् व्हिडिओ बाहेर आल्यानंतर सुद्धा त्यांचा राजीनामा का घेतला गेला नाही, याचे उत्तर सरकारने द्यावे', अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला आहे, राजीनामा नेमका काय कारणाने दिला आहे, त्याचे उत्तर आले पाहिजे. या गोष्टी सगळ्या अधिवेशन काळातच बाहेर कशा आल्या? दोन-एक महिने अगोदर होत्या, तर मग बाहेर का आल्या नाहीत? बाहेर आल्या होत्या अन् त्यांच्यापर्यंत पोचल्या असतील, त्याचवेळी त्यांचा राजीनामा का घेतला गेला नाही? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सरकारला द्यावे लागतील', असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.