
राहुल क्षीरसागर
Shrikant Shinde News : विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ हे निवडणूक आयोगाला भेटले. या भेटीत मतदानानंतर व्हीव्हीपॅट येणार नसेल तर ही निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. त्यांच्या या मागणीवर शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी सडकून टीका केली.
खासदार शिंदे म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत विजय मिळाल्यावर विरोधकांनी कधीच बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली नव्हती; पण विधानसभेचा निकाल त्यांच्या विरोधात लागल्यानंतर आता ईव्हीएम फॉल्टी असल्याचा खोटा गजर केला जातो. ही केवळ मतदारांची दिशाभूल करण्याची आणि राजकीय वातावरण निर्माण करण्याची डावपेच आहे.
जेव्हा निवडणुका होत नव्हत्या, तेव्हा हेच लोक ‘निवडणुका घ्या’ म्हणत होते. आता निवडणुका लागल्या आहेत, तेव्हा त्यांना त्या नको आहेत. कारण जनतेचा पाठिंबा मिळणार नाही, हे त्यांना ठाऊक आहे, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
प्रारूप मतदार याद्यांवर काम सुरू असून प्रशासन आगामी निवडणुकांसाठी सज्ज आहे, असे देखील त्यांनी सांगितले. तसेच ठाकरे बंधूंच्या वतीने ठाण्यात काढलेल्या मोर्चाबाबत ते म्हणाले, हे लोक जनतेच्या नव्हे, तर स्वतःच्या परिवाराच्या फायद्यासाठी एकत्र आले आहेत.
काही लोक मुद्दाम क्लस्टर प्रकल्पांना ब्रेक लावण्याचे काम करत आहेत. नागरिकांची दिशाभूल राजकीय अजेंड्यासाठी केली जाते. ठाण्यातील क्लस्टर प्रकल्प यशस्वीपणे पुढे जात आहेत; परंतु काहींना अडथळे निर्माण करण्यातच समाधान आहे, असे म्हणत नाव न घेता श्रीकांत शिदेंनी आमदार जितेंद्र आव्हाडवर टीका केली. तसेच रमाबाई आंबेडकर नगरमधील 10 हजारांहून अधिक नागरिकांना पुढील दोन वर्षांत सरकारमार्फत घरे मिळतील, असे देखील सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.