उद्धव ठाकरे म्हणाले, 'त्यावेळी' एकही मायेचा पूत...

BJP|CM Uddhav Thackeray| RSS| मग मोहन भागवतांना काय खान म्हणायंच का
CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeray

मुंबई: 'ज्यावेळी १९९० मध्ये काश्मिरी पंडीतांवर अत्याचार होत होते. तो काळ आठवा, तेव्हा केंद्रात भाजप समर्थित व्ही.पी. सिंहांच सरकार होते. जगनमोहन राज्यपाल होते. भाजप (BJP) आज ज्या काश्मिरी पंडीतांवर झालेल्या अत्याचाराचा चित्रपट बघुन अश्रू ढाळत आहे, पण त्यावेळी काश्मिरी पंडीतांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात कोणताही मायेचा पुत उभा नव्हता, दिवंगत बाळासाहेब ठाकरे एकटे असे होते ज्यांनी अतिरेक्यांनाही अंगावर घेतलं,' अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर पलटवार केला आहे.

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार आणि भाजपमधील (BJP) राजकीय वाद जोरदार पेटला आहे. सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यासह भाजपने शिवसेनेला घेरले आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्व, भ्रष्टाचार हे मुद्दे प्रकर्षाने मांडले जात आहेत. या टीकेला शिवसेनाप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

- मेलो तरी एमआयएमशी युती करणार

१९९० मध्ये व्ही.पी. सिंहांनी कश्मिरी पंडीतांसाठी काय केलं, भाजपने काय केलं, व्ही.पी. सिंह पंतप्रधान पदावर विराजमान झाले तेव्हा त्यांनी काश्मीरच्या मस्जिदमध्ये जाऊन चादर चढवली, पण कोणत्याही मंदिरात गेले नाही.अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. याचवेळी त्यांनी एआयएमआयएम शी युतीचा प्रस्तावही धूडकावून लावत मेलो तरी एमआयएमशी युती करणार नसल्याचं म्हटलं आहे. एमआयएमची ऑफर हा भाजपचा प्लॅन आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

- मग मोहन भागवतांच्या नावापुढे खान उपाधी जोडणार का?

तसेच, याचवेळी त्यांनी चार दिवसांपूर्वीची बातमी वाचून दाखवत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही निशाणा साधला आहे. आरएसएस मुस्लिमबहुल वस्त्यांमध्ये शाखा सुरु करणार अशी बातमी चार दिवसांपूर्वीच वाचली. मग हे कोण आहेत, या मुसलमानांचं काय करायचं, मग आरएसएसला मुस्लिम संघ म्हणायचं की मुसलमान संघ म्हणायच की राष्ट्रीय मुसलमान संघ म्हणायचं, मग मोहन भागवतांना काय खान म्हणायंच का, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

- भाजपची मेहबुबा मुफ्तीसोबत युती हे देशप्रेम का?

अफजल गुरुला फाशी नको म्हणणाऱ्या मेहबुबा मुफ्तीसोबत युती केलेली चालते मग आम्ही कॉंग्रेस, राष्ट्रवादी सोबत युती केली तर मोठं आभाळ कोसळलं का,म्हणजे आम्ही एखादी गोष्ट केली तर ती वाईट आणि तुम्ही काही केलं तर तो आदर्श म्हणून. मेबबुबा मुफ्तींनी जे काही तारे तोडले ते करुनही भाजपने त्यांच्यांशी युती केली, तरी ते देशप्रेमी आणि आम्ही कॉंग्रेस राष्ट्रवादीशी युती केली तर ती देशद्रोही का,असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com