Uddhav Thackeray : मुंबई : त्यांना गद्दारच म्हणणार, असे शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ठणकाऊन सांगितले. तसेच मंत्रीपदे तुमच्या बुडाला चिकटलेली असली, तरी ती काही काळापुरती आहे. मात्र, कपाळावरचा गद्दारीचा शिक्का या जन्मीतरी पुसला जाणार नाही, असे ठाकरे म्हणाले.
शिवाजी पार्क मैदानावर होत असलेल्या, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंगे गटावर जोरदार टीका केली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, तेव्हा अनेकांना प्रश्न पडला की आता शिवसेनेचे काय होणार? माझ्या मनात चिंता नव्हती, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आज हे शिवतीर्थ बघितल्यावर त्यांच्या मनात पुन्हा प्रश्न पडला की अरे बापरे, गद्दारांचे काय होणार?
इथे एकही माणूस भाड्याने आणलेला नाही. तासाची बोली लावून आणलेला नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला लगावला. यानंतर रावणदहन होणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितला. मात्र, यावेळचा रावण वेगळा आहे. आत्तापर्यंत रावण दहा तोंडांचा होता. आता ५० खोक्यांचा रावण झाला आहे, असल्याचा सणसणीत टोला त्यांनी लगावला.
हा खोकासूर आहे. काळ बदलतो, तसा रावण बदलतो. वाईट आणि संताप एका गोष्टीचा वाटतो. जेव्हा मी माझ्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात होतो, माझी बोटेही हलत नव्हती, शरीर निश्चल पडले होते, त्यावेळी मी ज्यांच्यावर जबाबदारी दिली होती, ते कटाप्पा.. म्हणजे कट करणारे अप्पा ते कटाप्पाच.. ते कट करत होते, अशा निशाणा त्यांनी शिंदे यांच्यावर साधला.
की हा पुन्हा उभा राहूच शकणार नाही. मात्र, त्यांना कल्पना नाही की हा उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. तुम्ही आई जगदंबेच्या शक्तीशी पंगा घेतला आहे. देव तुमचे भले करो, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.