आंबेडकरांना मिळाले दोन नवे भिडू; शिवसेना व काँग्रेसबाबत केलं मोठं विधान

आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांनी शंख फुंकले आहेत.
Prakash Ambedkar

Prakash Ambedkar

Published on
Updated on

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे (VBA) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी रणशिंग फुंकले आहे. ता. 15 जानेवारीपर्यंत उमेदवारांची यादी जाहीर करण्याची घोषणा करत त्यांनी दोन नवे राजकीय भिडू मिळाल्याचेही सोमवारी जाहीर केले. तसेच शिवसेना (Shivsena)काँग्रेसशी (Congress) युती करण्याबाबतही त्यांनी मोठे संकेत दिले आहेत. त्यामुळे पुढील काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना ही घोषणा केली आहे. ते म्हणाले, मुंबई महापालिका निवडणुकी बाबत अनेक सामाजिक संघटनांशी चर्चा होत आहे. राजकीय संघटनांशी युती करण्याबाबत चर्चा झाल्या. वंचित बहुजन आघाडी, इंडियन युनियन मुस्लिम लीग आणि राष्ट्रीय जनता दल (RJD) यांच्या बैठका झाल्या असून युती करण्याचा निर्णय झाला आहे. काही राजकीय पक्ष आमच्यासोबत येण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यामुळे 15 जानेवारीपर्यंत जागावाटप जाहीर केले जाईल. उद्यापासून मुंबईत प्रचाराला सुरूवात करत आहोत, असं आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे.

<div class="paragraphs"><p>Prakash Ambedkar</p></div>
देवेंद्रजी, तुम्ही त्यावेळी शाळेत होता...! मलिकांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

काँग्रेससोबत युती करण्याबाबत बोलताना आंबेडकर यांनी चर्चेची दारं खुली असल्याचे संकेत दिले. ते म्हणाले, निवडणुकीसाठी जे आमच्यासोबत येऊ इच्छितात, त्यांनाही आम्ही सोबत घेऊ. आम्ही काँग्रेससोबत जाण्यास तयार आहोत. एमआयएमशी आघाडी विधानसभा निवडणुकीवेळीच संपली. आम्ही मुंबईत एक पर्याय उभा करतोय. आम्हाला अपेक्षा आहे, त्याचा फायदा होईल.

लोकसभेवेळी काँग्रेसला म्हणालो होतो की, त्यांनी सलग चार वेळा जागा हरल्यात त्या जागा आम्हाला द्याव्यात. काँग्रेसच्या मनात भीती आहे की आम्ही हरलेल्या जागाही जिंकतो. त्यामुळे त्यांनी मागे आम्हाला भाजपची बी टीम म्हटले होते. पण तरीही काँग्रेसशी आजही आम्ही युती करायला तयार आहोत. राजकारण हे धार्मिक मुद्यांवर चालावे, असा आमचा हेतू नाही. म्हणून मागीलवेळी एमआयएमसोबत युती असतानाही काँग्रेस सोबत युती करायला तयार होतो. शिवसेना सोबत येणार असेल, तर आम्ही तयार आहोत. पण ते सोबत येणार का, हा महत्वाचा भाग आहे. एमआयएम धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावर पळून गेले. त्यामुळे मुंबईत आम्ही एकत्र येणार नाही, असंही आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

<div class="paragraphs"><p>Prakash Ambedkar</p></div>
प्रकाश आंबेडकरांचा पहिला वार भाजपवर! ओबीसींना सांगितली 'मन की बात'...

दरम्यान, ओबीसी समाजाने भाजपला मतदान करू नये, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द केलं आहे. राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशालाही न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. भाजपनं राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. तर आंबेडकरांनी या प्रकरणावरून भाजपकडेच बोट दाखवले आहे. आंबेडकर म्हणाले, शैक्षणिक आणि नोकरीतील ओबीसीचे आरक्षण हा वेगळा मुद्दा आहे. राजकीय आरक्षण वेगळं आहे. इम्पिरिकल डाटा तयार करून ज्यांना आरक्षणाची गरज आहे ते सिध्द करावे, असं सर्वोच्च न्यायालय म्हणाले होते.

नव्या जनगणनेमध्ये हा संपूर्ण डाटा मिळेल. त्यामध्ये ओबीसीचे गणना का होणार नाही, याचा खुलासा केंद्र सरकारने करायला हवा. हा खुलासा जोपर्यंत सरकार करणार नाही, तोपर्यंत ओबीसींनी भाजपला मतदान करू नये. त्यांनी इतर कुणालाही मतदान करावे. आज राजकीय आरक्षण गेले आहे. शिक्षण, नोकरीतील आरक्षणाविरोधात कुणी न्यायालयात गेलं तर तेही आरक्षण जाईल. त्यावर आघात थांबवायचा असेल, तर ओबीसींनी भाजपला मतदान करू नये, असं आंबेडकरांनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com