मुंबई - राज्यातील शिवसेनेत दोन गट पडल्याने महाविकास आघाडीची सत्ता गेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला आहे. या घटनाक्रमावर राज्याचे माजी मंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी त्यांच्या गटाची भूमिका मांडताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाबत आदर व्यक्त केला. (Eknath Shinde News Updates)
एकनाथ शिंदे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, त्याचा आनंद आम्हाला नाही. ही जी परिस्थिती उद्भवली यात शिवसेनेच्या 39 आमदारांच्या मतदार संघातील जे प्रश्न होते. आमदारांना जे वाईट-चांगले अनुभव येत होते. त्यातून बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्त्वाचा विचार पुढे घेऊन जाऊ या, अशी 50 आमदारांची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती, असे मत त्यांनी मांडले.
ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या मागणीवर वेळीच निर्णय घेतला असता तर ही वेळ आली नसती. आम्हाला कुणालाही आनंद नाही. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाबत आमच्या मनात कालही आदर होता, आजही आदर आहे, असे त्यांनी सांगितले.
मी मुंबईमध्ये गेल्यानंतर यावर बैठक होईल. त्यानंतर निर्णय होईल. मी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटायला चाललो आहे. त्यांच्या भेटीनंतरच आमची पुढील रणनीती सर्वांना कळेल. देवेंद्र फडणवीस यांच्याशीही भेट होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.