शेतकरी स्वावलंबनसाठी दोन हेकटरची मर्यादा काढा : किशोर तिवारी

मनरेगासाठी सरकारने 7 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यातूनही ग्रामीण अर्थव्यवस्थेला निश्‍चितपणे हातभार लागेल. -किशोर तिवारी
शेतकरी स्वावलंबनसाठी दोन हेकटरची मर्यादा काढा : किशोर तिवारी

नागपूर:  केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकरी सन्मान योजनेचा केलेला समावेश योग्य असून या योजनेसाठी कोरडवाहू शेतकऱ्यांना 2 हेक्‍टरची ठेवलेली मर्यादा योग्य नसल्याची प्रतिक्रिया वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केली.

अर्थसंकल्पानंतर "सरकारनामा'शी बोलताना ते म्हणाले, "शेतकऱ्यांना थेट नगदी अनुदान देण्याचा निर्णय चांगला आहे. यातून शेतकऱ्यांना निश्‍चितच दिलासा मिळणार आहे. परंतु यात केंद्र सरकारने कोरडवाहू शेतकऱ्यांना 2 हेक्‍टरची मर्यादा ठेवली आहे. ही मर्यादा योग्य नाही. विदर्भात मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू शेतकरी आहेत. त्यांच्याकडे जमिनीची मालकी 2 हेक्‍टरपेक्षा अधिक आहे. या स्थितीमध्ये या योजनेचा लाभ विदर्भातील अनेक शेतकऱ्यांना मिळू शकणार नाही. अशीच स्थिती राज्यातील इतर भागातील सुद्धा आहे. केंद्र सरकारने ही योजना लागू करताना 2 हेक्‍टरची असलेली मर्यादा काढून टाकावी."

तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना लागू केली आहे. तेलंगणा सरकारच्या धर्तीवर केंद्र सरकारने सुद्धा शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना लागू करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. मनरेगासाठी सरकारने 7 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यातूनही ग्रामीण अर्थव्यवस्थेला निश्‍चितपणे हातभार लागेल, अशी प्रतिक्रिया तिवारी यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com